शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
2
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
3
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
4
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
5
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
6
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
7
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
8
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
9
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
10
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
11
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
12
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
13
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
14
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
15
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
16
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
17
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
18
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
19
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
20
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
Daily Top 2Weekly Top 5

शेजाऱ्याशी भांडण? पंचवीस किलोमीटर पळा!

By admin | Updated: December 10, 2014 23:51 IST

आर्थिक वाद वाढले : शिरवळ परिसरात चार पोलीस चौक्यांची गरज

सुनीता नलवडे - लोहेम -गाव म्हटलं की भांडणतंटा आलाच अन् शेजार म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच. पण अशा शेजाऱ्याशी असणाऱ्या तंट्याचं रुपांतर मोठ्या भांडणात झालं तर पंचवीस किलोमीटरवर असणाऱ्या पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन पळावं लागतं. ही स्थिती आहे खंडाळा तालुक्यातील वाठार कॉलनी, खेड मोर्वे, विंग आणि लोहोम या गावांची.
खंडाळा तालुका चारही बाजूंनी विकसित होत असताना तालुक्यातील छोटी-मोठी गावे मात्र भौगोलिक दृष्ट्या मागे पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण खेड्यापाड्यात अजूनही पुरेशा सोयीसुविधा नाहीत. त्यामुळे नागरिकांना किरकोळ वादाची तक्रार द्यायची असेल तर खंडाळा, शिरवळ, लोणंद या ठिकाणी जावे लागते. वाठार कॉलनी, खेड-मोर्वे, लोहोम, विंग या गावांमध्ये इतर सुविधा देता येत नसतील तरी प्रशासनाने किमान येथे पोलीस चौक्या तरी द्याव्यात, अशी मागणी जनतेतून होत आहे.
तालुक्यात खंडाळा आणि लोणंद याठिकाणी पोलीस ठाणे आहे. दोन्ही ठिकाणी सुमारे दीडशेपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आहेत. त्यामुळे तालुक्यात तिसरे पोलीस ठाणे सुरू करण्याऐवजी ज्याठिकाणी गरज आहे, अशा दुर्गम भागात पोलीस चौक्या उभारणे गरजेचे आहे. असे झाल्यास वाढत्या गुन्हेगारीला आळा बसून डोंगरालगतच्या भागातील जनतेची सोय होणार आहे. जागेवरून, शेतीच्या हद्दीवरून भांडणतंटा होत असतो. अशावेळी तक्रार द्यायला पंचवीस ते तीस किलोमीटरची धावाधाव करावी लागते. प्रशासनाने याचा विचार करून पोलीस चौक्या उभारण्याची मागणी होत आहे.

कर्मचाऱ्यांचे विभाजन करावे
सध्या कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे तसेच नव्याने होऊ घातलेल्या तिसऱ्या पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचे विभाजन केल्यास या गावांमध्ये पोलीस चौक्या होऊ शकतात. खंडाळा तालुका डोंगरदऱ्यांच्या कडेने वसला आहे. वाड्या वस्त्यांवर लोक राहत आहेत. त्यांच्या सोयीसाठी प्रशासनाने विचार करावा.