शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा सैनिक अधिकाऱ्यांवर जादा भार

By admin | Updated: November 30, 2015 01:18 IST

राज्यातील चित्र : प्रत्येकांकडे सरासरी दोन जिल्ह्यांचा कारभार; कामावर होतोय परिणाम

प्रविण देसाई --कोल्हापूर--राज्यातील जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांवर जादा भार असल्याचे चित्र आहे. प्रत्येक अधिकाऱ्यांकडे सरासरी किमान दोन जिल्ह्यांचा पदभार आहे. त्यामुळे माजी सैनिकांची कामे वेळेत न होणे, त्यांना एका कामासाठी वारंवार यायला लागणे, असे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यातच शासनाने ‘सेवा हमी कायदा’ अंमलात आणल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.शासनाने राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये ‘सेवा हमी कायदा’ अंमलात आणला आहे. त्याला जिल्हा सैनिक कार्यालये अपवाद नाहीत. या कायद्यानुसार विशिष्ट वेळेत कामाची पूर्तता करणे बंधनकारक आहे. मुळात जिल्हा सैनिक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रमाण पाहता या कायद्याची अंमलबजावणी करताना येथील प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. सध्या राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी अंदाजे १७ जिल्ह्यांनाच ‘जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी’ आहेत. उर्वरित जिल्ह्यांत ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे एका अधिकाऱ्याकडेदोन किंवा तीन जिल्ह्यांचा अतिरिक्त पदभार आहे. तीन-तीन जिल्ह्यांचा कारभार करताना या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायचे कसे आणि वेळेत कामे करायची कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे? माजी सैनिकांच्या पाल्यांच्या विविध शैक्षणिक प्रवेश, सवलती, आदी कागदपत्रांवर वेळेत सह्या झाल्या तरच त्यांच्या प्रवेश, सवलतींची कामे मार्गी लागू शकतात. माजी सैनिकांसाठी विविध कल्याणकारी योजना शासनाने जाहीरकेल्या आहेत. त्याही माजी सैनिकांच्या कुटुंबापर्यंत कशा पोहोचणार? हा प्रश्न आहे. त्याचबरोबर शहीद जवानांच्या कुटुंबातील सदस्यास नोकरी, जमीन, घर व त्यांचे पुनर्वसन होण्यासाठी शासनाकडून घोषणा केल्या जातात. त्याची सुध्दा वर्षानुवर्षे पूर्तता होताना दिसत नाही. अशा अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.सध्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांना सुमारे ५० हजार वेतन मिळते. या वेतनाची रक्कम जरी जादा वाटत असली, तरी हुद्दा हा तहसीलदारांच्या बरोबरीचा नाही. हे देखील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीपदासाठी उमेदवारांची संख्या रोडावण्याचे एक कारण आहे. सैन्यातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना इतर आस्थापनांमध्ये चांगल्या हुद्द्यांवर व वेतनावर नोकऱ्या मिळत असताना इकडे यायचे कशाला? असाही मतप्रवाह आहे. यासाठी सरकारने ही पदे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत परीक्षा घेऊन भरली पाहिजेत. त्यामुळे लष्करी अधिकाऱ्यांव्यतिरिक्तही इतर अभ्यासू लोक या ठिकाणी येऊ शकतात.+कोल्हापूरचा पदभार उस्मानाबादच्या अधिकाऱ्यांकडे कोल्हापूरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल (निवृत्त) सुहास नाईक हे आॅक्टोबर महिन्यात निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागेवर अद्याप कोणत्याही पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे कोल्हापूरसह सिंधुदुर्गचा पदभार उस्मानाबादचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (निवृत्त) सुभाष सासने यांच्याकडे देण्यात आला आहे.