शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
2
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
3
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
4
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
5
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
6
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
7
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
8
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
9
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
10
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
11
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
12
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
13
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
14
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
15
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
16
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
17
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
19
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
20
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटीनंतर नियमित झालेल्या १८ ग्रामसेवकांना सुरक्षा ठेव नाही परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:19 IST

सातारा : जिल्ह्यात २००३ पासून ८६४ कंत्राटी ग्रामसेवक नियुक्त झाले असून, तीन वर्षांनी बहुतांशीजण सेवेत नियमित झाले. यामध्ये ...

सातारा : जिल्ह्यात २००३ पासून ८६४ कंत्राटी ग्रामसेवक नियुक्त झाले असून, तीन वर्षांनी बहुतांशीजण सेवेत नियमित झाले. यामध्ये २०१२ पासून शासकीय सेवेत आलेल्यांपैकी २९१ जणांना १० हजारांची सुरक्षा ठेव परत करण्यात आली आहे, तर मागील ५ वर्षांत ९५ पैकी ७७ जणांना दिली असून १८ जणांचे प्रस्ताव नसल्याने त्यांना देण्यात आलेली नाही.

शासकीय सेवेत काही ठिकाणी कंत्राटी नोकरभरती होत असते. तर जिल्हा परिषदेंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक म्हणून रुजू होताना प्रत्येक उमेदवाराकडून दहा हजारांची रक्कम सुरक्षा म्हणून घेण्यात येते. तीन वर्षांनंतर काम पाहून संबंधितांना शासकीय सेवेत नियमित करण्यात येते. कंत्राटी ग्रामसेवक असताना सहा हजार रुपये मानधन आणि ११०० रुपये प्रवास भत्ता देण्यात येतो, तर सेवेत नियमित झाल्यावर शासन नियमानुसार वेतन मिळते.

जिल्ह्यात २००३ पासून आतापर्यंत ८६४ कंत्राटी ग्रामसेवक नियुक्त झाले. त्यामधील ६४७ जणांना नियमित करण्यात आले. तर सेवेत नियमित झाल्यानंतर २०१२ पासून २९१ ग्रामसेवकांना दहा हजारांची सुरक्षा ठेव रक्कम परत करण्यात आलेली आहे.

जिल्ह्यात एकूण ग्रामसेवक

७६९

कंत्राटी ग्रामसेवक

१७

चौकट :

९५ ग्रामसेवक नियमित सेवेत समाविष्ट...

मागील पाच वर्षांत ९५ कंत्राटी ग्रामसेवकांना शासकीय सेवेत नियमीत करण्यात आले आहे. २०१६ साली ४४ जण नियमित झाले. तर २०१४ साली १६, २०१८ ला १५ आणि २०१९ ला २० जणांना कंत्राटीपदावरून कायमस्वरुपी ग्रामसेवक म्हणून सेवेत घेण्यात आले. २०२० या वर्षात एकालाही कायम करण्यात आले नाही, तर सुरक्षा ठेव रक्कम परत करताना नियमित सेवेत झालेल्या ग्रामसेवकांनी प्रस्ताव द्यायचा असतो. तो स्थायी समिती सभेत मंजूर झाल्यानंतर आदेश होऊन संबंधितांना पैसे परत केले जातात. पाच वर्षांत ९५ जण नियमित झाले आहेत. त्यातील ७७ जणांना त्यांची सुरक्षा ठेव रक्कम परत करण्यात आलेली आहे.

चौकट :

कंत्राटी ग्रामसेवक म्हणून नियुक्त होताना सुरक्षित ठेव घेतली जाते. तीन वर्षांनंतर कामकाजाची तपासणी होते. त्यानंतर ग्रामसेवक म्हणून शासकीय सेवेत कायम केले जाते. सेवेत आल्यानंतर घेतलेली सुरक्षित रक्कम दिली जाते. हा शासन नियम आहे, असे ग्रामसेवक संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

कोट :

शासन नियमाप्रमाणे कंत्राटी ग्रामसेवक म्हणून रुजू होताना सुरक्षा ठेव म्हणून रक्कम जमा करण्यात येते. तीन वर्षांनंतर नियमित झाल्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मान्यतेने संबंधितांना ही सुरक्षा ठेव रक्कम वेळोवेळी परत करण्यात आलेली आहे.

- अविनाश फडतरे,

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)

...........................................................