शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिलात सवलत नको, पूर्ण माफ करा : थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:15 IST

राज्य आणि केंद्रात कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देणे, शेतीमाल व दूध, मासे आदी मालाच्या किमती ...

राज्य आणि केंद्रात कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देणे, शेतीमाल व दूध, मासे आदी मालाच्या किमती सातत्याने कमी राहतील, असा प्रयत्न करतात. ग्राहकांच्या फायद्याचे धोरण राबविणे हे सगळे राजकारण शेतकऱ्यांभोवती खेळवून ग्राहकांची मते मिळवायची, हा उद्योग सुरू आहे. देशात पाचशेच्या आसपास शेतकरी संघटना आहेत. परंतु त्यांचा काही उपयोग शेतकऱ्यांना होत नाही. राज्य सरकार शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा देण्यात कमी पडत आहे. गेली ६० वर्षात राज्य करूनही शेतकरी कंगाल राहून आत्महत्या करतोय. शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिलाबाबत ऊर्जामंत्र्यांनी सरकारची ठाम भूमिका घेतलेली नाही. राज्यातील तीन पक्षाच्या सरकारमधे वीज बिल माफीवर एकमत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ऊर्जामंत्री, राष्ट्रवादीचे नेते परस्परविरोधी बोलून शेतकऱ्यांमध्ये गोंधळ उडवत आहेत.

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिलात ५० टक्के माफी जाहीर केली. हे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखे आहे. फार काळ शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले तर दिल्लीचे केंद्र सरकार सपाटून मार खाईल. त्याचबरोबर राज्यातील तीन पक्षीय सरकार नावालासुध्दा उरणार नाही, असेही पत्रकात म्हटले आहे.

- चौकट

प्रमुख मागण्या

१) शेतकऱ्यांना वीज, पाणी, रस्ते मोफत द्यावेत.

२) उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा.

३) शेतकऱ्यांचा फारच कळवळा असेल तर संपूर्ण कर्जमाफी करावी.

४) वीज बिल पूर्ण माफ करावे.