शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
4
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
5
Ashok Kharat : भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
6
अल्पवयीन प्रियकर-प्रेयसीला पकडलं, अमानुषपणे केस कापले अन् संपूर्ण गावातून धिंड काढून लावलं लग्न!
7
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
8
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
9
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
10
Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या कुटुंबात कोण कोण? अभिनेत्रीने शेअर केला फॅमिली फोटो
11
काय? राकेश बापटसोबत तेजश्री प्रधानच्या लग्नाची उडालेली अफवा, अभिनेता म्हणतो...
12
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
13
जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
14
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
15
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
16
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
17
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
18
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
19
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
20
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

रहिमतपूर परिसरातील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:39 IST

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरातील मोठ्या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम राखले आहे. मात्र वाठार किरोली ...

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरातील मोठ्या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम राखले आहे. मात्र वाठार किरोली येथे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांच्या राष्ट्रीय काँग्रेस पुरस्कृत पॅनेलने दहा-तीन जागांच्या फरकाने पराभव करत दहा वर्षांनंतर ग्रामपंचायतीची सत्ता काबीज केली.

रहिमतपूर परिसरातील तारगाव, धामणेर, साप, सायगाव या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम राखले, तर वाठार व दुर्गळवाडी ग्रामपंचायत काँग्रेसने आपल्या ताब्यात घेतली. तारगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कांतिलाल पाटील यांच्या विचाराच्या पॅनेलने विरोधी पॅनेलचा ९-२ जागांच्या फरकाने पराभव करत ग्रामपंचायतीवरील आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळविले. धामणेर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे नेते आदर्श सरपंच शहाजी क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सलग सहाव्यांदा सत्ता मिळवली. नऊपैकी आठ जागा बिनविरोध झाल्या होत्या. मात्र एका जागेसाठी निवडणूक लागली होती. परंतु प्रचंड मतांच्या फरकाने ही जागाही शहाजी क्षीरसागर यांच्या विचारांच्या उमेदवाराने जिंकली.

साप ग्रामपंचायतीसाठी दोन पॅनेलमध्ये अटीतटीची लढत झाली. ८-३ जागांच्या फरकाने दहा वर्षांनंतर सत्तांतर झाले. ही लढत राष्ट्रवादीच्या एका गटाविरोधात महाविकास आघाडी अशी थेट झाली. सायगाव ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी निवडणूक लागली होती. राष्ट्रवादीच्याच दोन गटात झालेल्या लढतीमध्ये मानसिंग घोरपडे यांच्या विचारांच्या पॅनेलने ५-२ जागांच्या फरकाने ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली. दुर्गळवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसच्या तुळशीदास यादव यांच्या विचारांच्या पॅनेलने विरोधी पॅनेलचा ५-२ जागांच्या फरकाने पराभव केला.

पंधरा वर्षांची सत्ता उलथवून ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेतली.

सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेल्या वाठार किरोली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जोरदार घमासान झाले. जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांच्या विचाराच्या राष्ट्रीय काँग्रेस पुरस्कृत पॅनेलविरोधात राष्ट्रवादीचे नेते संभाजीराव गायकवाड व भाजपचे युवा नेते विकास गायकवाड यांच्या विचारांच्या पॅनेलमध्ये तेरा जागांसाठी कडवा संघर्ष झाला. भीमराव पाटील यांनी १०-३ जागांच्या फरकाने संभाजीराव गायकवाड यांच्या विचाराच्या पॅनेलचा पराभव करत दहा वर्षांनंतर ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर घडविण्यात यश मिळविले.