शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
2
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
3
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
4
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
5
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
6
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
7
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
8
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
9
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
10
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
11
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
12
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
13
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
14
पाकिस्तानी खेळाडूंना भारतात नो एन्ट्री, केवळ बहुपक्षीय स्पर्धांसाठीच परवानगी; भारत सरकारकडून भूमिका स्पष्ट
15
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
16
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
17
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
18
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
19
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
20
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
Daily Top 2Weekly Top 5

मदन भोसले गटाकडून विरोधकांची अनामत जप्त

By admin | Updated: May 7, 2015 00:21 IST

‘किसन वीर’वर हॅटट्रिक : मतमोजणी पूर्ण; सर्व जागांवर विजय

भुर्इंज : वाई तालुक्यातील भुर्इंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक पदाच्या सर्वच्या सर्व जागा बहुमताने तिसऱ्यांदा जिंकत कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसलेंनी सहकाराला नवा आयाम देण्याच्या आपल्या प्रयत्नावर सभासदांकडून शिक्कामोर्तब करून घेतले़ कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी सकाळी पूर्ण झाली.
किसन वीर साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (दि. ५) झाली़ या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले होते़ संचालक पदाच्या २१ जागांपैकी पाच जागा उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशीच मदन भोसलेंनी बिनविरोध जिंकल्या होत्या़ उर्वरित १६ जागांसाठी २८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते़ ज्येष्ठ संचालक नारायण पवार यांनी केलेल्या बंडखोरीशिवाय शिवसेनेने १५ उमेदवार रिंगणात उतरविले होते. तर उमेदवारी दाखल करण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँगे्रसने कारखान्यावर पाचशे कोटींचे कर्ज असल्याचा आरोप करत निवडणुकीतून माघार घेतली होती़
मंगळवारी मतमोजणीच्या दिवशी दुपारी वळवाने हजेरी लावल्याने मतमोजणी प्रक्रिया सहा-सात तास लांबविण्यात आली़ पहिला निकाल रात्री उशिरा लागला. भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून सी. व्ही. काळे (२७,०२२) रात्री साडेअकरा वाजता विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. ़विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी : मदन भोसले (२६,६५६), गजानन बाबर (२५,३७१), मधुकर शिंदे े(२३,६९५), राहुल घाडगे (२६,७९३), प्रताप यादव (२६,३०५), प्रवीण जगताप (२६,५८६), रतन शिंदे (२६,००९), सयाजी पिसाळ (२६,२५२), चंद्रसेन शिंदे (२६,३८०), विजय चव्हाण (२६,८१०), नंदकुमार निकम (२६,६७५), सचिन साळुंखे (२६,५१०), अरविंद कोरडे (२७,०६५), आशा फाळके (२६,९६७), विजया साबळे (२५,९८८). अशा पद्धतीने शेवटचा निकाल यायला बुधवारची सकाळ झाली. निवडणूक अधिकारी रवींद्र खेबुडकर, तहसीलदार सदाशिव पडदुणे यांच्या नेतृत्वाखालील मोजीणी झाली. (वार्ताहर)


चोवीस हजारांहून अधिक मतांनी पराभूत...
सातारा जिल्ह्यातील वाई, सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी व महाबळेश्वर तालुक्यांचे कार्यक्षेत्र व ४४ हजार सभासद या कारखान्यात आहेत़ सातारा ऊस उत्पादक गटासह सोसायटी व मागासवर्गीय अशा पाच जागा बिनविरोध झाल्या होत्या़ भुर्इंज, वाई, जावळी, बावधन, कवठे, खंडाळा व कोरेगाव ऊस उत्पादक गट (प्रत्येकी तीन जागा ), महिला राखीव (दोन जागा), भटक्या विमुक्त जाती जमाती व इतर मागास प्रवर्ग अशा सोळा जागांसाठी मतदान झाले होते. सुमारे सत्तर टक्के मतदारांनी (३० हजार ७११) मतदानाचा हक्क बजावला़ मदन भोसले यांनी मतदारांशी असणाऱ्या जनसंपर्काच्या जोरावर एकहाती निवडणुकीला सामोरे जात मतदान झालेल्या सर्वच्या सर्व जागा किमान चोवीस ते सत्तावीस हजार मतांच्या फरकाने जिंकल्या़ सर्व विरोधी उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त केली़