शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

लसीकरणाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 4:34 AM

जिल्ह्यात शनिवारी नऊ ठिकाणी जवळपास शंभर आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. सकाळी लस दिल्यानंतर सायंकाळपर्यंत कोणती लक्षणे ...

जिल्ह्यात शनिवारी नऊ ठिकाणी जवळपास शंभर आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. सकाळी लस दिल्यानंतर सायंकाळपर्यंत कोणती लक्षणे आढळून आली का, यावरही जिल्हा प्रशासनाने बारकाईने लक्ष केंद्रित केले. जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी लस दिलेल्या बऱ्याच जणांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनीही समाधान व्यक्त केले.

एकाच दिवसात शंभर जणांना लस

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोना संसर्गामुळे राज्याचे अर्थचक्र थांबले. अनेकांचे प्राण गेले. सर्वांनाचा याचा त्रास झाला. गेले अनेक महिने लस येण्याची वाट पाहण्यात गेले. अखेर तो दिवस शनिवारी उजाडला अन् सातारकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ उत्साहाच्या वातावरणात जिल्हा शासकीय रुग्णालयासह नऊ ठिकाणी पार पडला.

‘सिव्हिल’मधील क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी बाळासाहेब खरमाटे यांना पहिली कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. या वेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष माधवी कदम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी आरोग्य संस्था अंतर्गत कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात पोलीस विभाग, सैन्य दल, हवाई दल व तिसऱ्या टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांना लस देण्यात येणार आहे. ही लस जिल्ह्यातील ९ ठिकाणी देण्यात येणार असून प्रत्येक दिवशी शंभर जणांना लस देण्यात येणार आहे. लस घेतल्यानंतर ३० मिनिटे निरीक्षणही करण्यात येणार आहे. लसी दिल्यानंतर आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.

लस टोचण्यापूर्वी एकाही आरोग्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर ताणाव दिसत नव्हता. सर्वच जण अगदी आनंदित होते. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनाही त्यांच्याकडे पाहून दिलासा मिळत होता. कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्यामुळे सध्या उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णही भारावून गेले आहेत. काेरोनातून आपण सहीसलाम आता मुक्त होऊ, अशी दृढ इच्छा बाधितांमधून व्यक्त होऊ लागली आहे.

‘सिव्हिल’मधील क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी बाळासाहेब खरमाटे यांना लसीकरणाचा पहिला मान मिळाला. त्यांनीही नाव नोंद केले होते. शुभारंभ करताना ते शेजारीच उभे होते. अचानक त्यांना या तुम्हाला पहिली लस देऊ, असे सांगताच त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. आपण पहिले मानकरी ठरलो, याचा त्यांना आनंद झाला.

ते म्हणाले, लस दिल्यानंतर मला कसलाही त्रास जाणवला नाही, आता लस घेतल्यामुळे कोरोनामुक्तीच्या कामासाठी आणखीन जोमाने काम करू. ज्या वेळी सर्वसामान्य नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे तेव्हा त्यांनी आपल्या स्वत:च्या प्रकृतीसाठी ही लस आवर्जून घ्यावी, असे आवानही बाळासाहेब खरमाटे यांनी या वेळी केले.

जिल्ह्यासाठी किती लसींचे डोस तयार आहेत?

जिल्ह्यात २५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीसाठी नोंद केली असून, ३० हजार डोस जिल्ह्यासाठी उपलब्ध झाले आहेत. रोज शंभर जणांना लस देण्यात येणार आहे. शेवटच्या टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांना ही लस दिली जाणार आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवानही करण्यात आले आहे.

लसीकरणानंतर दोघांना नाॅर्मल रिॲक्शन :

जिल्ह्यात पहिल्या दिवशी शंभर जणांना लस देण्यात आली. कऱ्हाड आणि कोरेगाव या ठिकाणी दोघांना साैम्य रिॲक्शन आली. त्यांना चक्कर आल्यासारखे झाले. त्यानंतर काही वेळात त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

कोरोनाच्या वैश्विक संकटात आम्ही राष्ट्रीय कर्तव्य समजून सेवाभावाने काम करत होतो. लसीकरण मोहिमेत आरोग्य कर्मचाऱ्यांची प्रथम लसीकरणासाठी निवड झाली. सर्वांना महत्त्व व गरज पटवून दिली. या लसीचा कोणताही त्रास होत नाही.

- डॉ. सुभाष चव्हाण

जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा

ज्यांना रिॲक्शन झाली त्यांचा आणि लसीचा काही एक संबंध नसल्याचा खुलासा जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी केला आहे. कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवानही त्यांनी केले आहे.

लसीकरण मोहिमेत कोरोना योद्धे म्हणून दिलेल्या प्राधान्यामुळे अभिमान वाटतो. सुरुवातीला धाकधूक होती, पण लस घेतल्यानंतर कसलाच त्रास जाणवत नाही. लस घेतल्यावर मोबाइलवर धन्यवाद व्यक्त करणारा मेसेज आला.

- डाॅ. अनिरुद्ध आठल्ये,

जिल्हा आरोग्य अधिकारी, सातारा

लस दिल्यानंतर आम्हाला कोणताही त्रास झाला नाही. आजपर्यंत आम्ही रुग्णांची सेवा केली आणि पुढेही करत राहू. आज लस उपलब्ध झाल्यामुळे आम्ही आणखी जोमाने काम करू. या लसीचा कोणताही वेगळा परिणाम होत नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

- डाॅ. योजना तराळ,

वैद्यकीय अधिकारी, बावधन

जिल्ह्यात सर्वांनाच लस मिळणार आहे. लस टोचल्यानंतर फारसे वेगळे जाणवले नाही. कुठलाही त्रास नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनीही ही लस घेणे गरजेचे आहे. पहिल्या दिवशीच आम्हाला लस टोचण्यात आल्यामुळे आम्ही आनंदी आहोत.

- सुरेंद्र शिर्के,

आरोग्यसेवक, बावधन, वाई