शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
3
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
4
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
5
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
6
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
9
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
10
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
11
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
12
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
13
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
14
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
15
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
16
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
17
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
18
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
19
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
20
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरी बंधाऱ्यात होणार ठणठणाट !

By admin | Updated: December 1, 2014 00:21 IST

शेतकरी चिंताग्रस्त : मराठवाडीत व्हॉल्व्हला गळती लागल्याचा परिणाम

कुसूर : वांग नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे अडवून पाणीसाठा करण्याचे काम सुरू आहे़ पाणी अडविलेले काही बंधारे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत़ मात्र टंचाई काळात या बंधाऱ्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या वांग-मराठवाडी धरणाच्या व्हॉल्व्हला गळती असल्यामुळे टंचाई काळात धरणात पाणीसाठा शिल्लक राहील का? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे़ व्हॉल्व्हची गळती काढण्याची मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्यातून होत आहे़
उशिरापर्यंत लांबलेला पावसाळा संपलेला असून, नदी ओढ्यांचा प्रवाह कमी होऊ लागला आहे़ रब्बी पिकांसाठी वांग नदीवरील आणे, अंबवडे, काढणे, मालदन येथील कोल्हापुरी बंधारे अडविण्याचे काम सुरू झाले आहे़ आणे येथील बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे़ रब्बी हंगामातील पिके भरत असताना बंधाऱ्यात पाणीटंचाई होते़ यावेळी मराठवाडी धरणातून पाणी सोडून बंधारे भरतात़
त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही शेतीला, जनावरांना वापरासाठी भरपूर पणी उपलब्ध होत असतो़ मालदन, साईकडे, काढणे, अंबवडे आणि आणे येथील बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणीसाठी होतो़ तर खळे आणि येणपे येथील बंधारे गत दोन वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहेत, ते पूर्ण करून त्यामध्ये पाणीसाठा करावा, अशी मागणी संबंधित गावातील शेतकरी सातत्याने करत आहेत़ मात्र, शासनाकडून कसलीही हालचाल होताना दिसून येत नाही़
ऐन पावसाळ्यात धरणात पाणीसाठा करणे अपेक्षित असतानाही तो केला नाही़ पावसाळा सरता धरणातून नदीत येणारे पाणी बंद करणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात होते़
त्याप्रमाणे पावसाळा संपता धरणातून सुटणाऱ्या पाण्याचा व्हॉल्व्ह बंद केला़ मात्र व्हॉल्व्ह नादुरूस्त अवस्थेत होता़ त्याची कसलीही दुरूस्ती न केल्याने सध्या यामधून पाण्याची गळती होत आहे़ (वार्ताहर)


कारखानदारांवर फौजदारी करा
वांग नदीवरील अनेक गावांना नदीशेजारील विहिरीमधून पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो़ बंधाऱ्यात अडविण्यात आलेल्या पाण्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवत नाही़ मात्र, वांग-मराठवाडी धरणातील पाणीसाठा गळतीमुळे झपाट्याने कमी होत असलेल्या पाण्यामुळे पाणी टंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे़