शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

"किसन वीर’चा ‘जरंडेश्वर’ होण्याची भीती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : किसन वीर सहकारी साखर कारखाना हा ५२ हजार शेतकऱ्यांच्या मालकीचा व्यवसाय आहे. या व्यवसायावर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : किसन वीर सहकारी साखर कारखाना हा ५२ हजार शेतकऱ्यांच्या मालकीचा व्यवसाय आहे. या व्यवसायावर त्यांची कुटुंबे अवलंबून आहेत. त्यांचे कोट्यवधी रुपयांचे भागभांडवल अन ठेवी या कारखान्याच्या उभारणीत अन प्रगतीतही सहकार्याच्या ठरल्या आहेत. साखर उद्योगापुढे अनंत अडचणीत आहेत, त्यापैकी काही अडचणी या जितक्या नैसर्गिक तितक्याच कृत्रिमदेखील आहेत. या परिस्थितीत किसन वीर कारखान्याचा जरंडेश्वर होतो की काय, ही शेतकऱ्यांना भीती आहे. नेत्यांविषयीचा आदर मनात साठवलेले शेतकरी जाहीरपणे बोलत नसले तरी खासगीत चर्चा करताना दिसतात.

माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांनी त्वेषाने आणि जिद्दीने कोरेगाव तालुक्यातील चिमणगावच्या माळावर जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना उभा केला. दुष्काळी परिस्थिती असतानाही तो चालवून दाखवला. मात्र कारखान्याची आर्थिक परिस्थिती खालावल्यानंतर शेतकऱ्यांचा हा कारखाना खासगीकरणात गेला. शेकडो एकर क्षेत्र खासगी लोकांच्या ताब्यात गेले. शेतकऱ्यांचे भागभांडवल बुडाले. किसन वीर सहकारी साखर कारखान्याचीही आर्थिक परिस्थिती बेताची झालेली आहे. कारखान्यावर कोट्यवधीचे कर्ज आहे. कारखान्याचा तोटा वाढत राहिल्यास हा कारखाना खासगी लोकांच्या ताब्यात जाऊन आपले भागभांडवल, ठेवी बुडतील, ही भीती शेतकऱ्यांना आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी या कारखान्याने अनेक उपक्रम राबविले आहेत. आर्थिक कोंडीत सापडल्याने कारखान्याला हे उपक्रम राबविताना अडचणी येत आहेत. साखरेला अपेक्षित दर मिळत नाही. कारखान्यात निर्माण केलेली साखर दर वाढेपर्यंत साठवून ठेवणे परवडत नाही. त्यामुळे बाजारभावाप्रमाणे कारखाना निर्माण केलेली साखर विकून टाकतो. या परिस्थितीत उसाचा दर एफआरपी कायद्यानुसार देताना तोंडाला फेस येत आहे. कारखान्यावर वाढलेले कर्ज हे मोठे दुखणे आहे. तेच कर्ज कारखान्याला अडचणीत आणू शकते, अशी शेतकऱ्यांना भीती आहे. ती रास्तदेखील आहे. कारण कारखान्याविषयीचे वास्तव पुढे आणण्याचा प्रयत्न होत नाही.

कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. सत्ताधारी माजी आमदार मदन भोसले यांचे पारंपरिक विरोधक असणाऱ्या आमदार मकरंद पाटील यांनी या कारखान्याबाबतची चिंता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापुढे मांडलेली आहे. कारखान्याची निवडणूक लढविण्याआधी या कारखान्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पवारांचा हात मिळेल, अशी त्यांची अपेक्षा आहे. तर कारखान्यावर होणाऱ्या आरोपांबाबतही कारखान्याचे चेअरमन मदन भोसले यांनी जाहीरपणे भूमिका मांडली पाहिजे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

कार्यक्षेत्रातील ऊस गेटकेनला!

किसन वीर साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र सहा तालुक्यांत आहे. जिल्ह्यातील या जुन्या कारखान्यांचे आधुनिकीकरण झाले. गाळप क्षमता वाढली. इथेनॉल, को - जनरेशन प्लॅन्ट, खतनिर्मिती असे प्रकल्प या कारखान्यावर उभे राहिले. आधुनिकतेच्या दिशेने भरारी घेणाऱ्या या कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाचे बिल थकवल्याने शेतकरी गेटकेनने दुसऱ्या कारखान्याला ऊस घालू लागले आहेत. चार - पाच एकर ऊस क्षेत्र असणारा शेतकरी दराचा विचार करतो. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हा शेतकरी इतर कारखान्यांना ऊस घालून मोकळा होतो. मात्र, संबंधित कारखान्यांमध्येदेखील शेतकऱ्यांना प्रतिष्ठा नसते. इतर कारखान्यांच्या उपकाराच्या ओझ्याखाली शेतकरी वागवत आहेत. ‘किसन वीर’ने अपेक्षित दर दिला तर निश्चितपणे गेटकेनचा प्रकार बंद होणार आहे.

रिकव्हरी वाढत नसल्याने दराची गोची

किसन वीर साखर कारखान्याची रिकव्हरी १९७२च्या दुष्काळातही ९.९६ टक्के इतकी होती. ही रिकव्हरी आजच्या घडीलाही साडेदहा टक्क्यांच्या आसपास आहे. उसाची रिकव्हरी अन साखर निर्मिती यावर एफआरपीचा दर ठरतो. एफआरपीच्या कायद्यानुसार ऊस नेल्यापासून १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना एफआरपीनुसार बिले द्यावी लागतात. या कायद्याचा भंग केल्यास सहकार विभागाच्या वतीने कायदेशीर कारवाई केली जाते. शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळत नाही. उसाचे बिल लांबले तरी पैसे मिळणार, ही खात्री असल्याने शेतकरी ‘किसन वीर’लाच ऊस घालतात. वाई तालुक्यातील शेतकऱ्यांना तसाही दुसऱ्या कारखान्याचा पर्याय नाही. शेतकरी मेहनत घेतात. उसाचे टनेज वाढविण्याची शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा सुरु असते. मात्र, दराच्या बाबतीमधील गणिते शेतकरी करत बसत नाहीत. इतर कारखान्यांनी दिला तेवढा दर आपल्या कारखान्याने दिलाच पाहिजे, अशा संघर्षासाठीही शेतकरी रस्त्यावर उतरल्याचे अथवा कारखान्याच्या दारात येऊन बसल्याचे उदाहरण नाही.