शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

फलटण तालुक्यात खरीप हंगाम धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:43 IST

आदर्की : फलटण तालुका शासन दरबारी रब्बीचा असला तरी खरीप हंगामात धोम-बलकवडीचे पाणी व जून महिन्यात चांगला पाऊस पडल्याने ...

आदर्की : फलटण तालुका शासन दरबारी रब्बीचा असला तरी खरीप हंगामात धोम-बलकवडीचे पाणी व जून महिन्यात चांगला पाऊस पडल्याने बाजरीबरोबर कडधान्य, तेलबियांची पेरणी झाली; पण पिके बहरत असताना पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने पिके सुकू लागल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

फलटण तालुका शासन दरबारी रब्बीचा आहे; पण निसर्गाचे ऋतूचक्र बदलल्याने व धोम-बलकवडी उजव्या कालव्यातून पाण्याची दोन आर्वतने वर्षातून सुटतात; पण पोट कालव्यांची कामे अपूर्ण असल्याने बांधापर्यंत पाणी पोहोचत नाही. कोरोनामुळे गत वर्षापासून रास्त भाव दुकानातून धान्य मोफत मिळत असल्याने बाजरी, ज्वारीला बाजारात मागणी नसल्याने शेतकऱ्यांकडे धान्य पडून आहे. बाजारात बाजरीला १,२०० ते १,४०० रुपये क्विंटलचा दर असल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी बाजरी पिकाकडे पाठ फिरवून कडधान्य घेवडा, मूग, चवळी तर तेलबिया सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल आदी पिकांची पेरणी केली. पेरणीवेळी पर्जन्यमान चांगले राहिल्याने उगवण चांगली झाली. पिके जोमदार आली; पण आंतरमशागतीनंतर खते देताना युरियाच्या तुटवड्यामुळे पिकांना वेळेत नत्र न मिळाल्याने पिकांची वाढ खुंटली.

आता बाजरी फुलोऱ्यात तर सोयाबीन, भुईमूग, शेंगाही फुलोऱ्यात आहेत. सूर्यफूल दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाने ओढ दिल्याने घेवडा, मूग, चवळीची फूलगळ होऊन पिके सुकू लागल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. यावर्षी प्रथमच पीक पद्धतीमध्ये बदल करून तेलवर्गीय पिकाकडे शेतकरी वळला. कडधान्य पिके पावसाच्या पाण्यावर चांगली येतात. धोम-बलकवडी कालव्याला पाणी सोडले आहे; पण पोट कालव्यांची कामे अपूर्ण असल्याने शेताच्या बांधावर पाणी जात नाही. त्यासाठी विद्युत मोटारीने पाईपलाईनद्वारे पाणी पिकांना पाणी देण्यासाठी विजेचा खेळखंडोबा सुरू असतो. या चार-पाच दिवसात पावसाने हजेरी लावली तर शेतकऱ्यांच्या हाती थोडीफार पिके लागतील. नाहीतर खरीप हंगाम वाया जाणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

(कोट..)

शेतकऱ्याच्या धान्य, भाजीपाल्याला कवडीमोल दर मिळत असताना खते, इंधन, वीज यांचे दर वाढले. आता शेतकऱ्याने खरीप हंगामातील मशागत, पेरणी, बी-बियाणे, खते यावर लाखो रुपये खर्च केला. पिके हाताला लागतेवेळी पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम वाया जाणार आहे.

- त्र्यबंकराव बोबडे, बिबी, फलटण

१३ आदर्की

फोटो - आदर्की परिसरात पावसाने दडी मारल्याने पिके सुकू लागली आहेत. (छाया : सूर्यकांत निंबाळकर)