शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
3
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
4
Top Marathi News LIVE Updates: हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
6
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
7
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
8
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
9
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
10
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
11
ड्रॅगनची अमेरिकेत घुसखोरी! माजी महापौरांनीच दिला देशाला धोका, चिनी एजंट असल्याचं केलं कबूल
12
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
13
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
14
Adhik Maas 2026: अधिक मासात अधिक पुण्यप्राप्तीसाठी 'या' दोन गोष्टी महिनाभर करण्याचा करा संकल्प!
15
Ashok Kharat : भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
16
मुंबईत उत्तराखंडमधून आणलेल्या ६.५ कोटींच्या हेरॉईनसह ३ अटकेत, नेमकी कुठे करण्यात आली कारवाई?
17
अल्पवयीन प्रियकर-प्रेयसीला पकडलं, अमानुषपणे केस कापले अन् संपूर्ण गावातून धिंड काढून लावलं लग्न!
18
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
19
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
20
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव, वाठार, कालवडे, बेलवडेत सत्तांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:39 IST

नांदगाव येथे दहा वर्षांनंतर सत्तांतर झाले आहे. डॉ. अतुल भोसले समर्थकांच्या ग्रामविकास पॅनलने सहा जागा जिंकत सत्तांतर घडविले. विरोधी ...

नांदगाव येथे दहा वर्षांनंतर सत्तांतर झाले आहे. डॉ. अतुल भोसले समर्थकांच्या ग्रामविकास पॅनलने सहा जागा जिंकत सत्तांतर घडविले. विरोधी पृथ्वीराज चव्हाण व उदयसिंह पाटील गटाला पाच जागांवर विजय समाधान मानावे लागले. ग्रामविकास पॅनलच्या विजयासाठी वि. तु. सुकरे गुरूजी, पै. दिलीप पाटील, पै. हंबीरराव पाटील, पै. संपत पाटील, विकास पाटील आदींनी परिश्रम घेतले.

कालवडे येथे १५ वर्षांनंतर सत्तांतर झाले. भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले व आमदार पृथ्वीराज चव्हाण समर्थकांनी नऊ जागा जिंकल्या, तर उदयसिंह पाटील गटाला फक्त चार जागांवर समाधान मानावे लागले. पॅनलच्या विजयासाठी शिवाजीराव थोरात, संताजी थोरात, पै. दादासाहेब थोरात आदींनी प्रयत्न केले.

बेलवडे ग्रामपंचायतीतही सत्तांतराचा नारळ फुटला. डॉ. अतुल भोसले व उदयसिंह पाटील समर्थकांनी एकत्रित येत आठ जागा जिंकल्या, तर विरोधकांना फक्त तीन जागांवर थांबावे लागले. हर्षवर्धन मोहिते, जगन्नाथ मोहिते यांनी पॅनलचे नेतृत्व केले.

वाठारच्या निवडणुकीत डॉ. अतुल भोसले गटाने सात जागा जिंकून परिवर्तन घडविले. विरोधी पृथ्वीराज चव्हाण-उदयसिंह पाटील गटाला फक्त चार जागा मिळाल्या. विजयी पॅनलचे नेतृत्व दिनकरराव मोरे, बाळासाहेब पाटील, पांडूरंग पाटील, प्रमोद पाटील यांनी केले.

काले येथील ग्रामपंचायत निवडणुकीत अतुल भोसले समर्थक कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने १४ जागा जिंकत सत्ता कायम ठेवली. विरोधी उदयसिंह पाटील, अविनाश मोहिते समर्थक पॅनलला फक्त तीन जागा मिळाल्या.

ओंड ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार पृथ्वीराज चव्हाण व अ‍ॅड. उदयसिंह पाटील समर्थकांनी सर्व जागा जिंकून सत्ता कायम ठेवली आहे. विजयी पॅनलचे नेतृत्व सर्जेराव शिंदे, लालासाहेब थोरात, अजयसिंह थोरात, बाजीराव थोरात यांनी केले.

धोंडेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत डॉ. अतुल भोसले व आमदार पृथ्वीराज चव्हाण समर्थकांनी नऊ जागा जिंकल्या, तर अ‍ॅड. उदयसिंह पाटील गटाला फक्त दोन जागा मिळाल्या.

आता या नव्या गावकारभाऱ्यांकडून मतदारांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. ते त्या कशा पूर्ण करणार, हे पहावे लागेल.

- चौकट

आता लक्ष आरक्षणाकडे...

ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल तर लागले. मात्र, सरपंच कोण, हे निश्चित नाही. त्यामुळे सरपंच आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आता कोणत्या गावात कोणते आरक्षण पडते, हे पहावे लागेल.