शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

अपघात चारशे... मृत्यू अडीचशे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:46 IST

सातारा : लाॅकडाऊन असताना आणि शिथिल झाल्यानंतरही अपघातांचे प्रमाण काही कमी झालेले नाही. गेल्या सात महिन्यांत चारशे अपघात झाले ...

सातारा : लाॅकडाऊन असताना आणि शिथिल झाल्यानंतरही अपघातांचे प्रमाण काही कमी झालेले नाही. गेल्या सात महिन्यांत चारशे अपघात झाले असून, त्यामध्ये तब्बल अडीचशे जणांना आपला प्राण गमवावा लागलाय. एकीकडे कोरोनाचे तांडव सुरू असताना दुसरीकडे मात्र अपघातांंचे सत्र सुरू असल्याचेच स्पष्ट होत आहे.

जिल्ह्यात कोरोनाने गेल्या पावणेदोन वर्षांपासून तळ ठोकला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात तर दिवसाला कोरोनाचे तब्बल चाळीस बळी जात होते. त्यामुळे सारे प्रशासन कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी एकवटले असतानाच दुसरीकडे मात्र अपघातांचे सत्र सुरू झाले. कोरोना काळात महामार्गावर वाहनांची रहदारी अत्यंत कमी होती. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडलेले लोक महामार्गावरून प्रवास करताना अत्यंत वेगाने जात होतो. या वेगानेच बऱ्याचजणांचा बळी घेतलाय. कोणाच्या गाडीचे टायर फुटले तर कोणाच्या कारचे नियंत्रण सुटून कार झाडावर आदळली तर काही वाहनांचे समोरासमोर अपघात झाले. यामुळे साहजिकच बळींचे प्रमाण वाढले. हे अपघात केवळ महामार्गावरच नव्हे तर आंतरजिल्हा रस्त्यांवरही झाले आहेत. कोरोनाच्या धांदलीमध्ये अपघातात इतक्या जणांचे बळी जाऊनही अपघाताविषयी कुठेही फारशी वाच्यता झाली नाही. त्याचे कारण म्हणजे लोक कोरोनाच्या दडपणाखाली वावरत आहेत.

सात महिन्यांत अडीचशे लोकांना अपघातात नाहक जीव गमवावा लागतो, ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासन एकीकडे अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र अपघातात नागरिकांना जीव गमवावा लागतोय. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत ३९ जणांचा मृत्यू झालाय. या काळात अनेकजण नातेवाईकांना भेटण्यासाठी अथवा फिरण्यासाठी बाहेर पडले होते. यातील बहुतांश अपघात हे रात्रीच्यावेळी झाले आहेत. ताणतणाव आणि अपुरी झोप यामुळे अपघात झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढलाय. काही ठिकाणी रस्ते चांगले नसल्याचाही अहवाल तयार करण्यात आलाय. पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे हे खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनचालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाले आहेत.

चाैकट : सर्वाधिक दुचाकीस्वारांचा मृत्यू...

जिल्ह्यात गेल्या सात महिन्यांत तब्बल २५० जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये १२८ हे दुचाकीस्वार असल्याचे समोर आले आहे. हेल्मेट न घातल्यामुळे दुचाकीस्वारांना आपला प्राण गमवावा लागलाय. तितकेच जखमीही झाले आहेत. जखमींमध्ये २३६ जणांचा समावेश आहे. या दुचाकीस्वारांनी जर हेल्मेट घातले असते तर नक्कीच बळींचे प्रमाण हे अल्प राहिले असते, असे पोलीस सांगताहेत.