शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीच्या गळतीवर वर्षाला पाच लाखांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:17 IST

सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास व शहापूर योजनेच्या जलवाहिनीला सातत्याने गळती लागत आहेत. ही गळती काढण्याचे काम ...

सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास व शहापूर योजनेच्या जलवाहिनीला सातत्याने गळती लागत आहेत. ही गळती काढण्याचे काम पालिकेकडून तातडीने हाती घेतले जात असले, तरी या कामी वर्षाकाठी पाच लाखांचा भुर्दंड पालिकेला सहन करावा लागत आहे.

सातारा शहराची लोकसंख्या १ लाख २२ हजार १९५ इतकी असून, हद्दवाढीमुळे हा आकडा आता दोन लाखांच्या घरात गेला आहे. या लोकसंख्येला कास व शहापूर जलयोजनेच्या माध्यमातून दररोज १३ लाख लीटर तर जीवन प्राधिकरणकडूनही सुमारे २७ लाख लीटर पाणीपुरवठा केला जातो.

पाणी पुरवठ्याच्या जलवाहिनीला सातत्याने गळती लागत असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. ही गळती रोखण्यासाठी प्रशासनाला वर्षाकाठी सुमारे पाच लाखांचा फटका बसत आहे. त्यामुळे पाणी वितरण व्यवस्थेचे सर्वेक्षण करून जुन्या जलवाहिन्या बदलणे गरजेचे बनले आहे.

(पॉइंटर्स)

२५०००००० शहरातील पाणी पुरवठ्याचे वर्षाचे बजेट

२००००००० पाणी पुरवठ्यावरील वर्षाचे वीजबिल

३० पाणीपुरवठा संदर्भातील एकूण कर्मचारी

(फोटो चौकट ०१)

पालिका परिसर : सातारा पालिकेच्या मुख्य व जुन्या प्रवेशद्वारासमोर जलवाहिनीला लागलेल्या गळतीतून पाण्याचे पाट वाहत असतात. तब्बल दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. पालिकेने आजवर अनेकदा येथील गळती काढण्याचे काम केले आहे. मात्र, तरीही हा प्रश्न काही सुटलेला नाही.

(फोटो चौकट ०२)

पोलीस वसाहत : साताऱ्यातील पोलीस वसाहत परिसर, शनिवार पेठ, गुरूवार पेठ, बुधवार नाका, बोगदा या परिसरातील व्हॉल्व्हला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही परिस्थिती जैसे थे असून, पाण्याचा अपव्यव सुरूच आहे. व्हॉल्व्ह दुरुस्तीसाठी प्रशासनाकडून म्हणावे तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.

(फोटो चौकट ०३)

सदर बझार : सदर बझार परिसराला पालिका व जीवन प्राधिकरणकडून पाणीपुरवठा केला जातो. येथील जलवाहिन्यांना सातत्याने गळती लागते. मुथा चौक, लक्ष्मी टेकडी, जिल्हा बॅँक, समर्थ मंदिर येथील जलवाहिनीतून दररोज हजारो लीटर पाणी गळतीमुळे वाया जाते.

(चौकट)

गळतीमुळे ८.५० टक्के पाणी वाया

सातारा पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात शहरात गळतीमुळे ८.५० टक्के पाणी वाया जात असल्याने स्पष्ट झाले आहे. शहरातील अनेक जलवाहिन्या व व्हॉल्व्ह कालबाह्य झाले आहेत. त्यामुळे ही गळती कायमस्वरूपी रोखण्यासाठी नवीन जलवाहिन्यांचे जाळे प्रशासनाला विणावे लागणार आहे.

(कोट)

सातारा शहरात जलवाहिनी व व्हॉल्व्हला गळती लागण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. अशी गळतीची ठिकाणे शोधून दुरुस्ती करण्याचे काम पाणीपुरवठा विभागाने हाती घेतले आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे प्रयत्न केले जातील.

- सीता राम हादगे, पाणीपुरवठा सभापती

फोटो :

२५ पालिका परिसर

२५ पोलीस वसाहत

२५ सदर बझार