शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
3
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
4
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
5
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
6
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
7
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
8
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
9
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
10
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
11
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
12
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
13
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
14
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
15
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
16
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
17
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
18
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
19
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
20
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर खत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:41 IST

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने नावीण्यपूर्ण पाऊल उचलले असून, जिल्ह्यातील बळीराजाला यावर्षीच्या खरीप हंगामातही बांधावरच खते पुरविण्यात येणार ...

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने नावीण्यपूर्ण पाऊल उचलले असून, जिल्ह्यातील बळीराजाला यावर्षीच्या खरीप हंगामातही बांधावरच खते पुरविण्यात येणार आहेत. याची सुरुवातही जिल्ह्यातील काही तालुक्यांत झाली आहे. यासाठी शेतकरी गटांना मागणी करून नोंदणी करावी लागत आहे. बाजारातील गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खरीप हंगाम घेण्यात येतो. सर्व ११ तालुक्यांत मिळून सर्वसाधरणपणे खरिपाचे क्षेत्र हे साडेतीन लाख हेक्टरहून अधिक असते. यामध्ये सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीन घेण्यात येते. याचे सर्वसाधारण क्षेत्र ६० हजार हेक्टरवर असते. याच्या खालोखाल भाताचे अंदाजे ५० हजार, बाजरी ५० हजारांवर आणि भुईमुगाचे ४० हजार हेक्टरच्या आसपास असते. जिल्ह्यात सध्या खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर कृषी विभागाने खते आणि बियाण्यांची मागणी केली आहे. काही प्रमाणात खत आणि बियाणेही उपलब्ध झालेले आहे. मान्सूनचा पाऊस जिल्ह्यात लवकरच दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पेरणीची तयारी सुरू केली आहे.

कृषी विभागाचे खत आणि बियाणांचे नियोजन झाले आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांना बांधावर खते देण्यात आली होती. आताही त्याचपद्धतीने खते पोहोच करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खत आणि बियाणे पुरवठा सुरळीत व्हावा हा यामागे हेतू आहे. त्यासाठी गावांतील शेतकऱ्यांच्या गटांनी खते आणि बियाण्यांची नोंदणी करावयाची आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना खत बांध, गावांत उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत किंवा शहरात ये-जा करावी लागत नाही. अनावश्यक गर्दी होत नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा वैयक्तिक खर्चही वाचेल, अशी कारणेही या पाठीमागे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता शहरापर्यंत ये-जा करावी लागणार नाही व वेळही वाचणार आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्याच्या पश्चिम भागातील तालुक्यात बांध व गावांत खते पोहोच केली जात आहेत. कारण, पश्चिमेकडे पाऊस लवकर होत असल्याने शेतकऱ्यांची खत मागणी आहे. लवकरच मागणीप्रमाणे इतर तालुक्यातही खते पोहोच केली जाणार आहेत.

कोट :

जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी खते आणि बियाणांचे नियोजन कृषी विभागाने पूर्णपणे केले आहे. पावसाळा जवळ आला असून, शेतकरी गटाने मागणी केल्यानंतर बांध आणि गावांत खते देण्यात येत आहेत. खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असे नियोजन झालेले आहे.

- गुरुदत्त काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा

फोटो दि.२०सातारा अ‍ॅग्री फोटो...

फोटो ओळ : सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बांधावर तसेच गावांत खत पोहोच करण्यात येऊ लागले आहे.

....................................................