शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
4
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
5
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
6
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
7
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
8
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
9
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
10
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
11
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
12
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
13
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
14
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
15
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
16
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
17
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
18
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कंगाल...दलाल मात्र होताहेत मालामाल !

By admin | Updated: December 4, 2014 23:47 IST

व्यवसायात गौडबंगाल : दूध खरेदी दरात कपात; विक्री दर मात्र वाढलेलेच

कमलाकर खराडे - पिंपोडे बुद्रूक -दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याला दूध व्यवसायाचे गणितच सुटेनासे झाले आहे. हा व्यवसाय करणारा शेतकरी दिवसेंदिवस कंगाल होत चालला आहे. तर दुसरीकडे मात्र, दलाल मालामाल होताना दिसत आहेत. दूध खरेदीदरामध्ये प्रचंड घट झाल्यानंतरही त्याची विक्री किमंत मात्र तीच आहे. महिनोनमहिने दूधसाठा शिल्लक राहू शकत नाही. यावरुन या व्यवसायातील गौडबंगाल दिसून येते.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरचे दर निम्म्याहून अधिक कमी झालेले आहेत. पावडरचा साठा संस्थांकडे पडून राहत आहे. निर्यातीवर वाढीव अनुदान मिळाले पाहिजे. अतिरिक्त दूध संकलन होत आहे, हे व असंख्य प्रश्न दूध संस्थापुढे उभे असल्याचे भासवून दुधाच्या खरेदी दरामध्ये तब्बल चार रुपये प्रतिलिटर घट करण्यात आली. मात्र, पिशवीबंद दुधाचे विक्री दर मात्र जैसे थे आहेत. त्याचबरोबर या व्यवसायातील दलालांचे कमिशनही कमी झाल्याचे ऐकिवात नाही. याउलट आपला माल जास्त ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी वाढीव कमिशनचे गाजर दाखवून किरकोळ विक्रेत्यांना मालामाल होण्याची आयती संधीच दूध संस्थांनी उपलब्ध करुन दिलेली आहे.
सर्व यंत्रणा केवळ दूध उत्पादक शेतकऱ्याला भरडण्याचा प्रयत्न करीत आहेत. खरेदी दरामध्ये कपात करताना कोणत्याही संस्थेने आपल्या संकलन केंद्राचे कमिशन कमी केलेले नाही. संकलन केंद्रांना अतिरिक्त खर्चासाठी ही प्रतिलिटर प्रमाणे पैसे दिले जातात, आणि तोट्याचे गणित दिसू लागले की शेतकऱ्याच्या दुधावर डल्ला मारला जातो. हे कितपत योग्य आहे. बाजारात मिळणाऱ्या पिशवी बंद गाईच्या दुधाची किंमत प्रतिलिटर ४२ रुपये आहे. वितरकाला सुमारे चार रुपये कमिशन मिळते. सध्या गाईचे दूध २० रुपये प्रमाणे खरेदी होते. मग दूध संस्थेकडे दूध पोहोच करण्यापासून ते पिशवीत बंद करून ग्राहकांना देण्यापर्यंत तब्बल २० रुपये प्रतिलिटर वाढीव किंमत किरकोळ ग्राहकाला मोजावी लागते. दर कमी झाल्यावर विक्रीही कमी होताना दिसत नाही. फक्त दूध पावडर आणि अतिरिक्त दूध संकलन या गोष्टी पुढे करून उत्पादकाला वेठीस धरण्यात येत आहे.


धवलक्रांतीला चूना...
काही वर्षांंपूर्वी राज्यशासनाने हरितक्रांतीची घोषणा केली होती. राज्यातील सर्व शेती सिंचनाखाली आणून हरित क्रांतीचे ते स्वप्न होते. ते स्वप्न अजूनतरी स्वप्न्च राहिलेले आहे. कारण अजूनतरी हरितक्रांती प्रत्यक्षात आलेली नाही. याच धर्तीवर राज्य दूध उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण करण्याबरोबरच अग्रेसर करण्यासाठीही धवलक्रांतीची घोषणा करण्यात आली होती. मात्र, दूध संस्था आणि दूध भेसळ करणाऱ्यांमुळे प्रामाणिकपणे दूध उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला आणि त्याच्या प्रयत्नांना चूना लावण्याचे पातक दूध संस्था करीत आहेत. त्यामुळे धवलक्रांतीची केवळ घोषणाच राहू शकते. कारण या स्थितीत प्रामणिक शेतकरी तग धरू शकत नाही.



दुध संकलन केंद्रापासून त्यावर प्रक्रिया होऊन ग्राहकापर्यंत पोहोच करण्यासाठी एक लिटर दुधासाठी किमान आठ ते दहा रुपये खर्च येतो. त्याचबरोबर घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांचे कमिशन या सगळ्यांचा विचार करता सध्या तरी यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही.
- डॉ. राजेंद्र महाडिक,
संकलन प्रमुख

दूध व्यवसायाचे अर्थकारण खूप अवघड झाले आहे. पशुधन जगवणे माणूस जगविण्यापेक्षा जड होत आहे. शासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढणे अपेक्षित आहे. दूध संस्था फक्त शेतकऱ्याचाच नकळतपणे खिसा कापत आहेत. हे योग्य नाही.
- बाळासाहेब गार्डी, दुग्धउत्पादक शेतकरी, पिंपोडे बुद्रुक