शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

औंधासुराच्या वचनामुळे नगरीस नाव औंध

By admin | Updated: April 2, 2015 00:48 IST

मूळपीठ म्हणून उदयास : श्री यमाईदेवीने औंधासुराचा वध केला त्या ठिकाणी उभारले स्मारक --नावामागची कहाणी-चोेवीस

रशिद शेख - औंध -आपले खडग औंधासुरावर सोडले व त्याचे शीर धडा वेगळे केले. अंतसमयी औंधासुराने श्री यमाईदेवीस वचन मागितले की, या नगरीस माझे नाव देण्यात यावे. त्यावेळी पासून या नगरीस औंध नाव पडले. श्री यमाईने औंधासुराचा जेथे वध केला. त्या ठिकाणी त्याला स्थान दिले असून, त्याचे स्मारक आहे. हे ठिकाण गावाच्या मध्यभागी आहे. येथेच श्री यमाईदेवीचे सुंदर असे मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून, समोर औंधासुराची मूर्ती आहे. औंध गावाच्या नैऋत्यास असलेल्या १५०० फू ट उंचीच्या टेकडीवर श्री यमाईदेवीचे स्थान आहे. या शक्तिपीठास मूळपीठ असे म्हणतात. हे देवस्थान जागृत स्वयंभू व पवित्र आहे. अतिप्राचीन व भव्य ऐतिहासिक दगडी, कोरीव दुर्मिळ कलाकृतीचे दर्शन म्हणजे श्री यमाईदेवीचे मंदिर इ. स. १७४५ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर १८६९ मध्ये श्रीनिवास परशुराम पंतप्रतिनिधी यांनी तटाचा जीर्णाेद्धार केल्याचा शिलालेख आहे. डोंगराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी काळ्या पाषाणातील ४३२ पायऱ्या आहेत. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले. परंतु औंधच्या राजाने एक दशक आधीच जनतेला स्वातंत्र्य दिले होते. श्रीमंत भगवानराव ऊर्फ बाळासाहेब महाराज नेहमी म्हणत औंध नेहमी अग्रेसर असावे, औंधचा आदर्श इतरांनी घ्यावा.