शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
2
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
3
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
4
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
5
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
6
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
9
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
10
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
11
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
12
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
13
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
14
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
15
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
20
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

ओलांडली साठी.... मोडले कंबरडे!

By admin | Updated: July 4, 2014 00:26 IST

गृहिणी अस्वस्थ : भाज्यांच्या दरवाढीने स्वयंपाकघर बनली ‘प्रयोगशाळा’

सातारा : ‘अच्छे दिन’ येणार, अशी आस असतानाच वाढत्या महागाईने मात्र अनेकांच्या तोंडचा घास पळवला आहे. तीस रुपये किलोने मिळणाऱ्या भाजीने चक्क साठी ओलांडली आहे. भाजीच्या वाढलेल्या या टप्प्यामुळे सर्वसामान्यांचे पुन्हा एकदा कंबरडे मोडले आहे. आधी पेट्रोल आणि आता भाजीच्या दरांमधील वाढीमुळे येणारा पगार कुठे आणि कसा पुरवायचा असा प्रश्न नोकरदारांना पडला आहे.
पावसाने ओढ दिल्याचा परिणाम भाजी उत्पादनावर झाला आहे. शहरात जिल्हाभरातून भाजीची आवक होते; पण मार्चपासून पडलेला कडक उन्हाळा आणि बेपत्ता झालेला पाऊस यामुळे शेतकरी अडचणीत आले. मिळेल तिथून पाणी आणून त्यांनी भाजीपाला टिकविण्याचा प्रयत्न केला; पण जून उलटूनही पाऊस नसल्याने भाज्यांचे उत्पादन घटले. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या ताटावर दिसू लागला. एक भाजी, आमटी, कोशिंबीर यासारखे जिन्नस असणारे ताट पाहण्याची सवय लागलेल्यांना भाजीच्या दराने पुकारलेला असहकार पचनी पडेनासा झालाय. मांसाहार करणाऱ्यांच्या घरात आठवड्यातून एक-दोनदा वेगळी चव चाखायला मिळते. मात्र, शुद्ध शाकाहारींच्या घरी जेवण म्हणजे महानगरांतील ‘कॉम्पॅक्ट फ्लॅट’ झालाय. जिथे जागा उपलब्ध नसल्यामुळे आहे त्याच्यातच सांभाळून घेणं क्रमप्राप्त झालंय. (प्रतिनिधी)