शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे वाढले जुन्या आणि नव्या पिढीत मतभेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:32 IST

सातारा : गावकी आणि भावकीमध्ये वाटप झाल्याने पाच वर्षांनी येणारी निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा परळी भागातील खडगाव गावाने जपली ...

सातारा : गावकी आणि भावकीमध्ये वाटप झाल्याने पाच वर्षांनी येणारी निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा परळी भागातील खडगाव गावाने जपली होती. मात्र, यावेळी कोरोनामुळे गावकऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. तरुण पिढीने निवडणूक पाहिजे यासाठी हट्ट केला आणि अर्ज भरून मुंबईला गेलेल्या एका उमेदवारामुळे गावात निवडणूक लागली. सध्या या निवडणुकीमुळे गावात प्रचाराचा धुरळा उडत आहे. जुनी पिढी आणि नवीन पिढीचे नेतृत्व करणारे यांच्यातील ही लढत रंगतदार ठरत आहे. परळी भागातील अनेक गावांमध्ये आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यांचे समर्थक राजू भोसले यांचे वर्चस्व आहे. त्यांच्या नियोजनाप्रमाणे अनेक ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात त्यांना यश आले आहे. मात्र, काही ग्रामपंचायतींमध्ये नव्या आणि जुन्या पिढीमध्ये समन्वय साधणे शक्य झाले नाही. त्यामुळे खडगाव सारख्या इतरही गावांमध्ये निवडणूक लागली आहे.

कोरोनाच्या काळात गावांमध्ये अनेक वाद झाले. या वादामुळे गावांमध्ये एकमत राहिले नाही. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्यासाठीही विरोध झाला. निवडणूक लागली आणि मागील वेळी महिला सरपंचांच्या नेतृत्वाखाली असलेली ही ग्रामपंचायत आता नव्या नेतृत्वासाठी रिंगणात उतरली आहे. सात सदस्यांची ग्रामपंचायत असलेल्या या ग्रामपंचायतीतील चार जागा बिनविरोध झाल्या आहेत. एक जागा रिक्त राहिली तर दोन जागांसाठी निवडणूक लागली आहे. त्यामुळे पॅनल तयार करता आले नाही. मात्र, दोन जागांवर सध्या जोरदार चुरस पाहायला मिळत आहे.

कोट

कोरोनाच्या काळात आम्ही कमिटीच्या माध्यमातून गावात शांतता रहावी आणि सर्वांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले. पण, काही लोकांना घरात थांबून राहणे जमत नव्हते. त्यांच्यासाठी ते अडचणीचे झाले. त्यांनी या नियमांना विरोध केला. नाईलाजास्तव त्यांच्यावरही कारवाई करावी लागली. त्याचा राग आता निवडणुकीच्या निमित्ताने निघत आहे.

निर्मला शिरटावले, माजी सरपंच, खडगाव

कोट

गावात निवडणूक लागू नये, बिनविरोध निवडणूक व्हावी असे अनेकांचे मत होते. मात्र, काहींनी त्याला विरोध केला. विशेषत: तरुण पिढीच्या मनात निवडणूक लावायचे होते. त्यामुळे निवडणूक लावली गेली. पण, यामध्येही कोणाचेही मतभेद न होता निवडणूक पार पडावी अशी अपेक्षा आहे.

श्रीरंग शिरटावले, माजी अध्यक्ष, तंटामुक्ती समिती