शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

भाग्यलक्ष्मीच्या कुशीत पिकांना तांब्याने पाणी

By admin | Updated: July 15, 2015 21:17 IST

\कोयना परिसरात पिकांची होरपळ : शेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची खांद्यावर घागर; तरवे वाळण्याची भीती

राजेंद्र सावंत - मणदुरे -पावसाचे माहेरघर असणाऱ्या पाटण तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने सिंचनक्षेत्र नसलेल्या कोरडवाहू क्षेत्रावर संकट ओढावले आहे. कडक उन्हामुळे पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी डोक्यावर हंडा घेऊन तांब्यांने पाणी घालून पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांकडून धडपड दिसत आहे.उन्हाळ्यात पडलेल्या वळवाने शेतकऱ्यांनी पाटण तालुक्यात मशागतीची कामे चांगल्या पद्धतीने उरकून घेतली होती. २ जूनपासून तालुक्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली. पेरण्यांची कामे चांगल्या पद्धतीने होऊन पिकांची उगवणही जोमात झाली आहे. शेतकऱ्यांनी कोळपणीची कामेही उरकून घेतली आहेत. भांगलणीची कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत. काही शेतकऱ्यांनी पिकांना खतांची मात्रा दिल्याने व सध्या पाऊस गायब झाल्याने पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. पाटण तालुक्याच्या मोरणा, मणदुरे, कोयना विभागात लागणीच्या भातांची लागण मोठ्या प्रमाणात केली जात असते. त्यासाठी तृप्ती, आर चोवीस, तेलदौसा, आजरा आदी जातींच्या भाताची लागवड केली जात असते. शेतकऱ्यांनी त्यासाठी मशागती करून भाताचे तरवे केले आहेत. काही शेतकऱ्यांनी वाढीसाठी या तरव्यांवर खते विस्कटली आहेत. मात्र, सध्या पावसाने उघडीप दिली असून, उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. कोवळ्या पिकांना उन्हाच्या झळा सोसत नाहीत. पिकांनी आता माना टाकायला सुरुवात केली आहे. या पावसाळ्यात सुरुवातीलाच कोयना परिसरात पंधरा दिवसांमध्ये विक्रमी १ हजार २०० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. परंतु ज्याठिकाणी डोंगर परिसरात सिंचनाची सोय नाही, त्याठिकाणी हे तरवे जगविण्यासाठी डोक्यावरून पाणी आणून पिकांना द्यावे लागत असल्याचे विदारक चित्र आहे. आणखी आठ दिवस अशीच पावसाने ओढ दिल्यास शेतकऱ्यांची हातची पिके वाया जाण्याची चिन्हे आहेत. डोंगर कपारीतील गावात नाचणी हे महत्त्वाचे पीक आहे. या पिकावरच येथील शेतकऱ्यांचे जीवनमान अवलंबून असते; मात्र तरवे वाळत असल्यामुळे ते जगविण्यासाठी पाणी डोक्यावरून आणूनच तांब्याने ते तरव्यांवर शिंपडावे लागत आहे. शेतकऱ्यांना मदत हवी...पावसाने ओढ दिल्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापन करण्यासाठी १ टक्का युरिया १० लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी केल्यास पिके तग धरू शकतात. शेतकऱ्यांनी पिके वाचविण्यासाठी ही उपाययोजना करणे गरजेचे आहे.- एस. एस. चव्हाणकृषी सहायक, पाटणकोणतेही पीक घ्यायचे असल्यास सामान्य शेतकऱ्याला अगोदर कर्जाचे ओझे घ्यावे लागते. आता पावसाने ओढ दिल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. तांब्याने पाणी देऊन किती दिवस ही पिके तग धरणार? शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा. - संजय शिंदेशेतकरी, चिटेघरकोयना धरणातील पाणीसाठा५०.९८ टीएमसीकोयना विभागातील एकूण पाऊस१,२४३ सेमीनवजा विभागातील एकूण पाऊस१,३५२ सेमीमहाबळेश्वर विभागातील एकूण पाऊस१,३५२ सेमी