शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

साखरेला योग्य भाव मिळावा म्हणून केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:39 IST

पाटण : ‘शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीप्रमाणे योग्य दर मिळावा म्हणून केंद्र सरकार धोरण ठरविते. मात्र, त्याचप्रमाणे राज्यातील सहकारी ...

पाटण : ‘शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीप्रमाणे योग्य दर मिळावा म्हणून केंद्र सरकार धोरण ठरविते. मात्र, त्याचप्रमाणे राज्यातील सहकारी साखर कारखान्यात तयार होणाऱ्या साखरेलाही योग्य दर मिळाला पाहिजे. देशातील साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनेच मदत करणे गरजेचे आहे,’ असे मत गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केले.

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार दूरदृश्यप्रणालीद्वारे ऑनलाईन पार पडली.

यावेळी ते बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, यशराज देसाई, जयराज देसाई, चेअरमन अशोकराव पाटील, व्हाईस चेअरमन राजाराम पाटील, माजी चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण, आनंदराव चव्हाण, सोमनाथ खामकर, गजानन जाधव, शशिकांत निकम, संपतराव सत्रे, पांडुरंग नलवडे, बाळासाहेब शेजवळ, राजेंद्र गुरव, बशीर खोंदू, भरत साळुंखे, विजय पवार, संतोष गिरी, सुरेश पानस्कर, प्रकाशराव जाधव उपस्थित होते. सभेला शिवदौलत बँकेच्या तारळे, पाटण व ढेबेवाडी या शाखांमधून सभासद शेतकरी ऑनलाईन उपस्थित राहिले.

देसाई म्हणाले, ‘सध्या सर्वच क्षेत्रात स्पर्धा असल्याने सहकारी साखर क्षेत्रात ही मोठी स्पर्धा आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी राज्यातील इतर मोठ्या कारखान्यांच्या तुलनेत देसाई कारखाना लहान असतानाही इतर कारखान्यांबरोबर एफआरपीप्रमाणे देसाई कारखान्याने शेतकऱ्यांना दर दिला आहे.

कोणताही कारखाना कधीही मुद्दाम एफआरपीचे हप्ते रखडत ठेवत नाही. केंद्र सरकारचे साखर धोरणच राज्यातील सहकारी साखर कारखानदारीसाठी योग्य नाही. परिणामी राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत आली आहे.

प्रतिकूल परिस्थितीमध्येही देसाई कारखान्याची चांगली वाटचाल सुरू आहे. १२५० मेट्रिक टन क्षमतेचा कारखाना संपूर्ण एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना उसाचा दर देतो. हे एकमेव उदाहरण आहे. १२५० मेट्रिक टन क्षमतेचे अनेक कारखाने डबघाईला आले, लिलावात निघाले. खर्चामध्ये काटकसर करत जादा उत्पादन करून एफआरपी देण्याचा प्रयत्न केला.’

चौकट

...तर त्यांचे सभासदत्व रद्द होणार..!

जे ऊस उत्पादक सभासद शेतकरी कारखान्याची सवलतीची साखर घेऊन, कारखान्याचे इतर सर्व लाभ घेऊनही आपल्या क्षेत्रात पिकलेला शंभर टक्के ऊस देसाई कारखान्याला घालत नसतील अथवा त्यांच्या शंभर टक्के पिकलेल्या उसापैकी थोडा जरी ऊस बाहेर गेला, तरी त्या सभासदाला संचालक मंडळ खुलासा मागतील.