शहरं
Join us  
Trending Stories
1
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
4
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
5
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
6
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
7
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
8
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
10
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
11
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
12
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
13
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
14
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
15
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
16
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
17
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
18
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
19
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
Daily Top 2Weekly Top 5

कशाला पाहिजे संचालकपद?

By admin | Updated: April 2, 2015 00:43 IST

सहकारी संस्था निवडणूक : वाळवा-शिराळा तालुक्यातील चित्र

अशोक पाटील - इस्लामपूर वाळवा व शिराळा तालुक्यातील विविध सहकारी सोसायट्या, बँका, पतसंस्था, कारखाने आदींच्या निवडणुका बिनविरोध होत आहेत. सद्यस्थितीत अशा संस्थांवर संचालक म्हणून जाण्यासाठी कोणालाही स्वारस्य राहिलेले नाही. वर्षानुवर्षे जे संचालक पदावर कार्यरत आहेत, तेच पुन्हा बिनविरोध निवडून येत आहेत. काही घराणी सोडली, तर इतरांकडून लष्कराच्या भाकरी भाजण्यापेक्षा शेतीवर लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला जात आहे.
वाळवा व शिराळा तालुक्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. ग्रामीण भागातील बहुतांशी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. कट्टर विरोधी नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या हातात हात घालून संस्था बिनविरोध केल्या आहेत. जे वर्षानुवर्षे संस्थांवर कार्यरत आहेत, तेच पुन्हा त्या पदावर दिसत आहेत. नवीन चेहरे मात्र सध्या या निवडणुकीकडे ढुंकूनही पाहात नाहीत. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीत कसलीही स्पर्धा नसल्याने ऐन उन्हाळ्यात शांतता पसरली आहे.
राजारामबापू साखर कारखाना, राजारामबापू दूध संघ, राजारामबापू बँक या संस्था सक्षम आहेत. या संस्थेवर ठराविक घराण्यांचीच मक्तेदारी आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गत निवडणुकीत नेत्यांनी एकमेकांच्या हातात हात घालून संचालकपदे वाटून घेऊन निवडणूक बिनविरोध केली. त्यामुळे यावेळीही निवडणुकीत स्मशानशांतता दिसत आहे. राजारामबापू कारखान्याच्या निवडणुकीत रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेचे तोकडे आव्हान असते. बहुतांश जागा बिनविरोध होत असतात. त्यामुळे यावेळची निवडणूकही बिनविरोधच होण्याची शक्यता आहे.
दूध संघ व बँकेवर आमदार जयंत पाटील ठरवतील त्यांनाच संचालक पदाची संधी दिली जाते. त्यामुळे इच्छा असूनही बहुतांशी कार्यकर्ते निवडणुकीपासून अलिप्तच राहतात. अशीच अवस्था राजारामबापू उद्योग समूहातील सर्वच सहकारी संस्थांची आहे. त्यामुळे संस्थांच्या निवडणुकीत नेहमीचे चेहरे सोडले, तर इतर कोणालाही स्वारस्य राहिलेले नाही. त्यांनी आता आधुनिक शेती करण्यावर भर देण्यास सुरुवात केली असल्याचे चित्र आहे.


गावाच्या विकासाला प्राधान्य
आमदार शिवाजीराव नाईक व माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानसभा निवडणुकीवेळी संघर्ष झाला होता. त्यात सत्यजित देशमुख यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांचीही भर पडली होती. शिराळा तालुक्यातील या तीन नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी बहुतांश सेवा सोसायट्या बिनविरोध करीत गावाच्या विकासाला प्राधान्य दिले आहे.