शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

खोके देणाऱ्या घेणाऱ्यांची ही कसली राजकीय संस्कृती, ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीसांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 12:18 PM

साने गुरुजींचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून ती संस्कृती विचारात घेणे गरजेचे

सांगली : महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने खोक्याची संस्कृती जन्माला आली आहे. खोके देणाऱ्यांची आणि घेणाऱ्यांची ही कसली राजकीय संस्कृती?, असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी उपस्थित केला.सांगलीवाडी येथील ज्ञानभारती मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. संमेलनाच्या स्वागताध्यक्ष म्हणून भारती विद्यापीठाच्या शालेय समिती अध्यक्षा विजयमाला कदम, जतचे आमदार विक्रमसिंह सावंत, ज्येष्ठ कवी प्रदीप पाटील, वसंत पाटील, प्रा. डॉ. आबासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, विकत घेणाऱ्यांना आणि देणाऱ्यांनाही राजकीय संस्कृती नसते. आज पक्षीय राजकारणात उघडपणे जनता विकली जात आहे. ज्या प्रतिनिधींना जनतेने निवडून दिले आहे, तेदेखील आज उघडपणे विकले जात आहेत. हे प्रतिनिधी खोक्यांनी विकले किंवा विकत घेतले जात असतील, ही कसली राजकीय संस्कृती आज आपण पाहत आहोत?, आज विकत घेणाऱ्यांना आणि विकत देणाऱ्यालाही संस्कृती नसते.जाती-धर्माच्या नावाखाली सत्तेचा उपभोग घेण्यात राजकारणी व्यस्त असून, सध्याचे राजकारण अशुद्ध झाले आहे. शुद्ध राजकारणासाठी महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या राजकारणाची गरज आहे. लोकांच्या मनात जाती-धर्माचे विष कालवून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. अशावेळी समाजामध्ये सांस्कृतिक संवादाची गरज आहे. माणसाचे बंधुतेत रूपांतर करण्याचे काम भारतीय संस्कृतीने केले आहे. धर्म ही शुद्ध कल्पना आहे. मुक्तीची कल्पना आहे. सर्व धर्मातील चांगुलपणा म्हणजे भारतीय संस्कृती होय. चांगुलपणाची विभागणी करून चालत नाही. साने गुरुजींचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून ती संस्कृती विचारात घेणे गरजेचे आहे.हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, मुस्लीम, जैन आदी धर्मातील संस्कृती आणि विश्वात्मकता विचारात घेतली पाहिजे. महात्मा गांधी, महात्मा फुले, महात्मा बसवेश्वर, येशू ख्रिस्त, महंमद पैगंबर यांच्या विचारांची बेरीज करण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणShripal Sabnisश्रीपाल सबनीस