शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
2
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
3
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
4
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
5
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
6
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
9
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
10
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
11
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
12
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
13
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
14
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
15
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
20
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रभक्तीच्या वारकऱ्यांचे वडगाव!

By admin | Updated: December 4, 2014 23:41 IST

चारजण शहीद : तब्बल ७0 जवान देशाच्या सेवेत, गावाच्या देशप्रेमाची कीर्ती सर्वदूर

अमित काळे - तासगाव ... तासगाव तालुक्यातील पूर्व भागातले एक छोटेसे खेडे... सध्या येथील तब्बल ७० जवान देशाच्या सीमा मजबूत ठेवण्यासाठी डोळ्यात तेल घालून सीमेवर सेवा बजावताहेत. एवढेच नाही, तर या गावातले चार जवान शहीद झाले. अत्यंत निधड्या छातीच्या, राष्ट्रप्रेमाने भारलेल्या या गावाला देशसेवेची परंपराच लाभल्याने शूरवीरांची भूमी म्हणून या गावाचा लौकिक आता देशभर होत आहे.
एकाच गावातल्या चार जवानांना देशाची सेवा करताना आलेलं वीरमरण ही अत्यंत वेदना देणारी घटना असली तरी, हे बलिदान व्यर्थ तर जाणार नाहीच, पण आज वडगावच्या मातीची कीर्ती सर्वदूर गेली. राष्ट्रप्रेम हा या मातीतला गुणच. गावात या शहीद जवानांची स्मारके उभी आहेत, हे या गावाचे वैशिष्ट्य.
गावाचे क्षेत्र किती, महसूल किती, पिके कोणती, उत्पन्न किती... ही ठरलेली मानकं. पण वडगावच्या वीर भूमीनं त्यात भर टाकत स्वत:चे आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे. एकाच कुटुंबातले तीन सख्खे भाऊ सैन्य दलात भरती होतात, त्यातले दोन भाऊ शहीद होतात, हे कल्पनेच्या पलीकडलेच आहे. तुकाराम विठोबा पाटील व नारायण विठोबा पाटील या दोघांचा सियाचीनच्या अतिउंच भागात बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दरीत कोसळून १९९३ मध्ये मृत्यू झाला. त्यातल्या तुकाराम पाटील यांचे पार्थिव तर २१ वर्षांनंतर मिळाले. पण तत्पूर्वी सहा वर्षे अशाच पद्धतीने त्यांचा भाऊ नारायण यांचाही असाच सियाचीनमध्येच १९८७ मध्ये मृत्यू झाला.
१९९९ मधील कारगिल युद्धात शत्रूशी दोन हात करताना महादेव पाटील यांना वीरमरण आले. त्यांचेही वय २३-२४ एवढेच होते. छातीचा कोट करून शत्रूशी झुंजत असताना ते शहीद झाले आणि आता उमाजी पवार हे नक्षलवाद्यांशी सामना करताना शहीद झाले. देशासाठी लढताना दिलेले हे बलिदान पुढच्या पिढीसाठी ते प्रेरणादायी ठरणार आहे.
तासगाव तालुका हा क्रांतिकारकांचा तालुका. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांच्या फौजा या भूमीने दिल्या, हा इतिहास आहे. स्वातंत्र्यानंतर देशरक्षणाच्या महत्त्वपूर्ण कार्यात सहभागी झालेल्या तालुक्यातील अनेक गावांतील जवानांच्या धाडसाने, साहसी वृत्तीने हे वेगळेपण जपले आहे. त्यात वडगावचे योगदान खूप महत्त्वाचे आहे.