शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यात वारणा कालव्यास गळती

By admin | Updated: May 25, 2015 00:29 IST

मोठ्या प्रमाणावर पाणी वाया : पश्चिम भागात शेकडो एकर जमीन नापीक

सहदेव खोत - पुनवत -जिल्ह्यात एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी लोकांचे हाल सुरू असताना, दुसरीकडे मात्र शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात वारणा डाव्या कालव्याच्या गळतीमुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. या कालव्याच्या २७ कि.मी.पर्यंतच टप्प्यात गळतीमुळे ऐन उन्हाळ्यात अनेक ठिकाणी धबधबे पाहावयास मिळत असून, ओढे, नोलेही तुडुंब वाहत आहेत.वारणा डाव्या कालव्यात ० ते २७ कि.मी.च्या टप्प्यात सध्या पाणी सोडले आहे. या टप्प्यातील कालव्याच्या गळतीची समस्या जुनीच आहे. कालव्यात पाणी सोडले की ते हजारो ठिकाणांहून झिरपून शेतकऱ्यांच्या शेतातून ओढ्या-नाल्यांना मिळत आहे. त्यामुळे खुजगावपासून ते चांदोलीपर्यंतच्या भागात तर नाले-ओढे सध्या ऐन उन्हाळ्यात ओसंडून वाहत आहेत. अनेक ठिकाणी छोटे-मोठे धबधबे नजरेस पडत आहेत. सततच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणकणसे उगवली आहेत. सध्या कालवा प्रवाही असल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी भातपेरणीसाठी तयार केलेली शेते पाण्याने भरली आहेत. उसाची शेते तुडुंब झाल्याची दृश्ये पाहावयास मिळत आहेत. ही दृश्ये पाहिल्यानंतर चांदोलीला भेट देणारे पर्यटक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.कालव्याला पाणी आले की असंख्य एकरातील शेती पाण्याने भरते, तर काही ठिकाणी ओल येते. पाणी बंद झाल्यावर शेते सुकू लागल्यावर काही तरी करावे म्हटले, तर पुन्हा कालव्याला पाणी येते. अशा परिस्थितीत आमचे शेत पिकणार कसे? असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.कालव्यात पाणी सोडल्यानंतर काही लोकांचा फायदा होत असला तरी, ज्यांची शेती या कालव्यामुळे बुडाली आहे, अशा शेतकऱ्यांसाठी हा कालवा कर्दनकाळ ठरत आहे. गळतीमुळे जिल्ह्याच्या एका टोकाला घोटभर पाण्यासाठी दाहीदिशा, तर पश्चिम टोकाला पाण्याचा अपव्यय, असा विरोधाभास पाहावयास मिळत आहे. आमचे शेत पिकणार कसे?अनेक वर्षांपासून कालव्याची गळती काढण्याबाबत कोणतीही कामे झालेली नाहीत. पाटबंधारे विभाग याबाबत नेहमीच उदासीन राहिला आहे. सध्या वारणा डाव्या कालव्यात ० ते २७ कि.मी.च्या टप्प्यात पाणी सोडले आहे. कालव्याला पाणी आले की असंख्य एकरातील शेती पाण्याने भरते, तर काही ठिकाणी ओल येते. सध्या कालवा प्रवाही असल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी भातपेरणीसाठी तयार केलेली शेते पाण्याने भरली आहेत. उसाची शेते तुडुंब झाल्याची दृश्ये पाहावयास मिळत आहेत. पाणी बंद झाल्यावर शेते सुकू लागल्यावर काही तरी करावे म्हटले, तर पुन्हा कालव्याला पाणी येते. अशा परिस्थितीत आमचे शेत पिकणार कसे? असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.