शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘निनाईदेवी’चा ताबा देण्यास स्थगिती

By admin | Updated: December 9, 2014 01:24 IST

हायकोर्टाचा निर्णय : दालमिया शुगरचे कर्मचारी रिकाम्या हातांनी परतले


हायकोर्टाचा निर्णय : दालमिया शुगरचे कर्मचारी रिकाम्या हातांनी परतले
शिराळा : करुंगली (ता. शिराळा) येथील निनाईदेवी सहकारी साखर कारखाना विक्रीबाबत कारखान्याच्या सभासदांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेबाबत न्यायालयाने आज, सोमवारी दालमिया शुगर प्रा. लि. या कंपनीस निकाल होईपर्यंत बेकायदा ताबा देऊ नये, पोलीस संरक्षण देऊ नये, असा आदेश दिल्याने आज कारखान्याचा ताबा घेण्यासाठी आलेल्या ‘दालमिया’ कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
राज्य सहकारी बँकेने निनाईदेवी कारखान्याचा लिलाव काढून दालमिया ग्रुपला हा कारखाना २४ कोटीला विकला होता. त्यावेळी निनाईदेवी कारखान्याचे सभासद, कर्मचारी, कर्जपुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्थांना वाऱ्यावर सोडले होते. फक्त राज्य बँकेने स्वत:च्या कर्जाचा विचार करून हा लिलाव केला होता. यानंतर ताबा घेण्यासाठी आलेल्या जवळजवळ १00 कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या दोन ट्रॅव्हल्स बसेस फोडून त्यांना मारहाण केली होती. कारखान्यातील ५ लाख ३७ हजारांच्या वस्तू चोरीस गेल्या होत्या. यामुळे ‘निनाईदेवी’ व ‘दालमिया’ यांच्यातील वाद वाढतच होता. याप्रश्नी प्रांताधिकारी यांच्याबरोबर समझोता बैठकही झाली होती.
निनाईदेवी कारखान्यास जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून २00१ मध्ये ८ कोटी ७0 लाख कर्जही दिले होते. यासाठी १५ एकर जमीन तारण देण्यात आली होती. परतफेड न झाल्याने कर्जाची थकबाकी २७ कोटी रुपयांवर गेली आहे. पंधरा एकर जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर बँकेचा बोजा असताना, ही जमीन विकली गेल्याने जिल्हा बँकेने राज्य बँक व दालमिया कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. (पान ९ वर)

पाचशेचा जमाव अन् कडेकोट बंदोबस्त
आज सकाळी १0 वाजल्यापासून कारखाना गेटसमोर जवळपास पाचशे सभासद, कर्मचारी कंपनी अधिकाऱ्यांना विरोध करण्यासाठी जमा झाले होते. तसेच संघर्ष होऊ नये म्हणून मोठा पोलीस फौजफाटाही ठेवला होता. आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान दालमिया ग्रुपचे जवळजवळ १५0 अधिकारी, कर्मचारी कोकरुड पोलीस बंदोबस्तात ताबा घेण्यास गावात आले होते.
मात्र, सकाळी ११ वाजता न्यायालयाच्या आदेशाबाबत कोकरुड पोलीस ठाण्यात कळविले. त्यानंतर पोलिसांनी कंपनी अधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत कल्पना दिल्यावर कंपनीचे अधिकारी, कर्मचारी परतले. ‘निनाईदेवी’चे सभासद, कर्मचारी, तसेच कर्जपुरवठा करणाऱ्या वित्त संस्थांनी आपापले हक्क व पैसे मिळावेत यासाठी लढा चालू केला आहे. या लढ्यामुळे दालमिया ग्रुपबरोबर राज्य बँकही अडचणीत आली आहे.
याचदरम्यान या कारखान्याचे सभासद महादेव कदम, आनंदराव पाटील आदी पाचजणांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. कारखान्याचा विक्री व्यवहार चुकीचा झाला आहे.
तसेच सभासदांचा विचार न करता कमी किंमतीत विक्री झाली असून या व्यवहारात सभासदांवर अन्याय केला आहे, अशा मुद्यांच्या आधारे याचिका दाखल केली होती. याचिकेवर आज न्यायालयाने निकाल होईपर्यंत निनाईदेवी कारखान्याचा ताबा कंपनीला देऊ नये, तसेच पोलीस संरक्षणही देऊ नये, असा आदेश दिला.
(वार्ताहर)