शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

सलगरे, चाबुकस्वारवाडी ‘म्हैसाळ’च्या प्रतीक्षेत

By admin | Updated: May 25, 2015 00:28 IST

३०० हेक्टर पिके संकटात : पाणी सोडण्याबाबत अधिकाऱ्यांची उदासीनता; लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष

दादा खोत - सलगरे -सलगरे व चाबुकस्वारवाडी ही मिरज पूर्व भागातील शेवटची गावे. म्हैसाळ योजनेच्या पाणी क्षेत्रात या गावांचे जवळजवळ ८० टक्के क्षेत्र पाण्याखाली आहे. सलगरे-चाबुकस्वारवाडी ओढ्यामधून या चार वर्षांपासून पाणी सोडल्याने सुमारे ३०० हेक्टर क्षेत्र ‘म्हैसाळ’च्या लाभक्षेत्रात आले आहे. पंपगृह सुरू होऊन महिना उलटून गेला तरी सलगरे, चाबुकस्वारवाडीत पाणी मिळालेले नाही.ओढ्याला पाणी सोडल्याने चार किलोमीटर ओढ्याच्या परिसरामध्ये ऊसशेती व द्राक्षशेती, भाजीपाला लागवड आदी पिकांचे क्षेत्र वाढले. साहजिकच नैसर्गिकरित्या ओढ्याचा वापर ‘म्हैसाळ’च्या पाणी वहनासाठी झाला. या परिसरामध्ये ओढ्याला बंधारे आदी जलसिंचनाची कामे झाली. सर्वांत जास्त विहिरींची संख्या ही याच पट्ट्यात आहे. त्यामुळे या ओढ्याला ‘म्हैसाळ’चे पाणी येणार, या आशेने लाखो रुपयांची गुंतवणूक शेतकऱ्यांनी या लाभक्षेत्रामध्ये केली. परंतु पाणी सोडून महिना लोटला तरी या चार किलोमीटर नैसर्गिक परिस्थिती असलेल्या व बागायत क्षेत्र असलेल्या भागाला अजूनही क्षमतेने पाणी सोडले नसल्याने, या परिसरातील ऊसशेती, द्राक्षशेती व भाजीपाला शेती ही पिके संकटात आली आहे, तर काहींच्या उसाला त्याचा फटका बसला आहे.ओढ्यातून पाणी सोडण्यासाठी गेट क्र. १ व २ मधून पाणी सोडल्यास या लाभक्षेत्रातील ४०० हेक्टरपर्यंतचे क्षेत्र पाण्याखाली येते. परंतु हे क्षेत्र सलगरे लाभक्षेत्रांतर्गत असल्याने या गेटमधून पाणी सोडता येणार नाही, अशी अधिकाऱ्यांची भूमिका आहे. या लाभक्षेत्राला पाणी सोडण्यासाठी वारंवार मागणी अर्जाचे कारण पुढे करून पाणी सोडण्यास टाळाटाळ केली आहे. अगोदरच अवकाळी व हवामानाच्या दृष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्याला या कृत्रिम पाणीटंचाई व मागणी अर्जाशिवाय पाणी नाही, या अधिकाऱ्यांच्या धोरणाचा सामना करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी मागणी अर्ज भरले आहेत. ऊसशेती व द्राक्षबागा वाचविण्यासाठी कूपनलिकांचा आधार शेतकरी घेत आहेत. परंतु भीषण पाणीटंचाईने पाणी पातळीच खालावली असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.भीषण पाणीटंचाईसंदर्भात ‘म्हैसाळ’च्या एका अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, आवर्तन मे महिन्यापर्यंत असल्याचे सांगत पाणी जतपर्यंत जाणार असून, मेमध्ये पाणी सोडले जाईल, असे त्याने सांगितले. पिके वाया गेल्यानंतर पाणी कशासाठी सोडणार? असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत.५० टक्के शेतकऱ्यांनी पाणी अर्ज भरल्याशिवाय पाणी सोडले जाणार नाही. शेतकऱ्यांनी मागणी अर्ज भरुन आॅफिसला सादर करावेत. ५० टक्के मागणी अर्जाची अट पूर्ण झाल्यानंतर पाणी सोडण्याची तयारी केली जाईल.- एस. डी. बावचेकर,सहायक अभियंता