शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनातील काळीजखुणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:25 IST

- वैजनाथ महाजन --------------------- एंट्रो साध्या साध्या गोष्टींतूनही आपणास निरामय जगण्याची सवय लागत असते. कोरोना काळात अशी एकमेकांना मदत ...

- वैजनाथ महाजन

---------------------

एंट्रो

साध्या साध्या गोष्टींतूनही आपणास निरामय जगण्याची सवय लागत असते. कोरोना काळात अशी एकमेकांना मदत करणारी असंख्य माणसे आपल्या अवतीभोवती होती. हा जसा सदाचाराचा भाग झाला, तसाच आपणास लोकांमधील राक्षसी प्रवृत्तीचाही विदारक आणि तितकाच उग्र वाटावा असाही अनुभव आला. जेव्हा असे एखादे सार्वत्रिक संकट कोसळते, तेव्हा सारेच खडबडून जागे होत असतात, असा सार्वत्रिक अनुभव आहे. गत वर्षात काेराेनाने जगासमाेर जे काही आव्हान उभे केले, ते पाहता भविष्यात आपली वाटचाल कशी सुरू ठेवायची याचा परोपरीने विचार करण्याची गरज आहे. कोरोनातील काळीजखुणा आपणास हेच सांगत नाहीत काय?

--------------

जेव्हा एखादी महामारी समस्त मानवजातीला घेरून टाकत असते, त्यावेळी त्याबरोबर काही ना काही नवे पण समस्त मानव जातीसमोर येत असते. जेव्हा १८८२ मध्ये पहिल्यांदा प्लेगची साथ आली, तेव्हा आपणा सर्वांना प्रथमता--- संसर्ग म्हणजे काय? ते समजून आले. त्यानंतर १९३८ मध्ये प्रथमच हिवतापाची साथ आली आणि साध्या हिवतापाने हजारो माणसे मरण पावली. कारण तोपर्यंत वैद्यक शास्त्राने याबाबत कोणतेही संशोधन केले नसल्याने उपाय सापडणे कठीण होते. आज लक्षात येते की, प्लेगचे आता संपूर्ण जगातून उच्चाटन झाले आहे आणि हिवताप अत्यंत सर्वसामान्य झाला आहे. बऱ्याचवेळा आपल्याकडे असे म्हटले जाते की, ‘मागच्यास ठेच पुढचा शहाणा’ तसेच आपण आता कोरोनाकडे मागे वळून पाहत असताना असे लक्षात येते की, कोरोनाने आपणाला खूपच सावध आणि सजग बनविले आहे. त्यामुळे आपण आपल्या परीने आपणास स्वयंशिस्त लावून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. नाहीतर यापूर्वी आपण कधी वारंवार हात धूत होतो? पण आता अनेक लोकांनी ही शिस्त पाळण्यास सुरुवात केली आहे. हा, नाही म्हटले तरी फैलावलेल्या आणि फैलावत असलेल्या कोरोनाचाच प्रभाव म्हणावा लागतो.

अनेक छोट्या-छोट्या देशात तोंडावर मुखपट्ट्या लावून घराबाहेर पडण्याची पद्धत रूढच होती; पण आपणाकरिता मात्र ती सर्वस्वी नवीन होती. त्यामुळे मास्क लावणे आणि त्याची सवय लावून घेणे याकरिता थोडा सार्वजनिक वेळ द्यावाच लागला आणि आता आपण त्याबाबतीतही उत्तमरीत्या मास्क लावून बाहेर पडण्याची शिस्त लावून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. अशा साध्या साध्या गोष्टीतून काय साध्य होते, असा प्रश्न अनेकवेळा समाजात डोके वर काढत असतो; पण अशा साध्या साध्या गोष्टीतूनही आपणास निरामय जगण्याची सवय लागत असते हे कसे नजरेआड करता येईल? आता राहिला प्रश्न बिघडलेल्या नातेसंबंधांचा आणि नव्याने घडून आलेल्या नातेसंबंधाचा. माझ्या बघण्यात आलेला काहीसा धक्कादायक आणि काहीसा तितकाच सुखावणारा असा बदल.. एक हॉटेलचालक आहेत. त्यांनी आपल्या तालुक्याच्या ठिकाणाहून ४० कोरोना रुग्ण जिल्हा रुग्णालयात नेऊन ठणठणीत बरे केले आणि ते सुद्धा एका गाडीत अगदी शेजारी-शेजारी बसून त्यांच्याशी गप्पा-टप्पा करत त्यांना परत आपल्या तालुक्याच्या गावी घेऊन येत असत. या कृश प्रकृती हाॅटेलचालकाला आजतागायत कोरोनाची साधी बाधाही झालेली नाही. या बाबतीत त्याला असे वाटते की, मी ज्या निरपेक्ष भावनेने या रुग्णांची सेवा केली, त्यांच्याच सदिच्छेमुळे माझी प्रकृती ठणठणीत राहिली.

कोरोना काळात अशी एकमेकांना मदत करणारी असंख्य माणसे आपल्या अवतीभोवती होती. हा जसा सदाचाराचा भाग झाला, तसाच आपणास लोकांमधील राक्षसी प्रवृत्तीचाही विदारक आणि तितकाच उग्र वाटावा असाही अनुभव आला. शहरात राहणाऱ्या एका कथित सुशिक्षित कुटुंबाने प्रत्यक्ष गावाकडून आलेल्या वृद्ध आई-बापाच्याकरिता आपल्या घराची कवाडे बंद करून घेतली आणि त्या वृद्ध दाम्पत्याला आल्यापावली हतबल होऊन गावी परतावे लागले; पण ज्यावेळी शहरातील त्यांच्याच या मुलाला जेव्हा कोरोनाची बाधा झाली, तेव्हा त्या वृद्ध आई-वडिलांनी मात्र गावाकडच्या आपल्या खोपटाचे दार मात्र मुलाकरिता उघडे ठेवले आणि त्याला गावाकडे पूर्ण बरा करून पुन्हा शहरात धाडले. यातून या मुलाने आणि सुनेने काही बोध घेतला की नाही हे कळण्यास काही मार्ग नाही; पण आता हे लक्षात येत आहे की, तथाकथित सुशिक्षितांच्यातही संकुचित भावना आणि वृत्ती भलतीच बळावलेली दिसते. कारण आता नागरी जीवनात राहणारी मंडळी टाचेपुरती वहान कापण्यास अत्यंत सफाईदारपणे शिकू लागली आहेत आणि त्यातच धन्यता मानू लागली आहेत. जेव्हा असे एखादे सार्वत्रिक संकट कोसळते, तेव्हा सारेच खडबडून जागे होतो; पण एकमेकांची विचारपूस करणे मात्र अगदी सोईस्करपणे विसरून जात असतात. खरेतर जेव्हा कोरोनासारखी झपाट्याने पसरणारी एखादी महामारी माणसाचा पिच्छा सोडण्यास तयार नाही, तेव्हा सर्वांकरिता नव्या सार्वजनिक सत्यधर्माची गरजपण त्याचवेळी निर्माण होतो? असते. त्यातूनच प्रत्येकाचा प्रत्येक दुसऱ्याकरिता हात पुढे येणे अगत्याचे असते. आपल्याकडे बोलीभाषेत असे म्हटले जाते की, ‘होणारे न चुके जरी ब्रम्हातया आडवा’ तेव्हा आपण अशावेळी केवळ काठावर बसून कोणालाही असे हात मार, तसे पाय मार असे सांगण्यातून फारसे काही साध्य होतो? नसते, तर आपणही प्रवाहातील एक आहोत, असे समजून आपल्या व्यक्तिगत जगण्याला थोडी मुरड घालून सार्वजनिक जीवनात वावरणे फार फार गरजेचे असते. अशावेळी ज्यासी अपंगीता काही त्यासी हृदयी धरण्याची गरज निर्माण झालेली असते. अशा गरजेला जागणे हाच खरा मानवता धर्म असतो. ज्या शास्त्रज्ञाचे हृदयसुद्धा बॅटरीवर चालत असे ते जगविख्यात शास्त्रज्ञ स्टिफन हाॅकिंग यांनीसुद्धा अखेरच्या क्षणापर्यंत मानवजातीच्याच कल्याणाचा विचार केला. आणि तो विचार सांगण्याकरिता ते प्रत्यक्ष मुंबईनगरीत येऊन गेले होते. आपण निदान हा सारा पूर्व इतिहास समजून घेऊन भविष्यात आपली वाटचाल कशी सुरू ठेवायची याचा परोपरीने विचार करण्याची गरज आहे. कोरोनातील काळीजखुणा आपणास हेच सांगत नाहीत काय?

- वैजनाथ महाजन