शहरं
Join us  
Trending Stories
1
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
4
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
5
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
6
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
7
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
8
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
10
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
11
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
12
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
13
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
14
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
15
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
16
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
17
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
18
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
19
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
Daily Top 2Weekly Top 5

कामेरी तालुक्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित

By admin | Updated: November 27, 2014 00:22 IST

रघुनाथ हळदे-पाटील : आष्टा, पेठ तालुका करण्याची मागणी चुकीची

कामेरी : वाळवा तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र कामेरी तालुका करण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन असताना आष्टा किंवा पेठ तालुका व्हावा, अशी मागणी करणे चुकीचे असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते व कामेरी तालुक्याची मागणी करणारे मुख्य प्रवर्तक रघुनाथ हळदे-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.
याबाबत बोलताना हळदे-पाटील म्हणाले, वाळवा तालुक्याचे विभाजन करून वेगळा तालुका निर्माण करण्याबाबत राज्य शासनाने ३१/५/२00९ पूर्वी प्रस्ताव सादर करावेत, असा जाहीरनामा काढला होता. शासनाने दिलेल्या मुदतीत फक्त कामेरी तालुका होण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला गेल्याने इतर गावांचा तालुका म्हणून विचार होणार नाही. त्यानुसार शासनाकडून कामेरी तालुका का व्हावा, याबाबत काही मुद्द्यांचा खुलासा १0/५/२0१२ रोजी मागण्यात आला होता. त्यामध्ये कामेरी तालुका करण्याचा हेतू, कामेरी तालुक्यात नेमक्या कोणत्या गावांचा समावेश असावा, त्याचा नकाशा, इस्लामपूर-कामेरी अंतर ३ ते ४ कि. मी. असताना नवीन तालुका होण्याकामी ग्रामसभेचा ठराव, समाविष्ठ गावांची संमत्ती आहे का? या बाबींचा खुलासा मंडल अधिकारी व तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे. तसेच स्वतंत्र कामेरी तालुका होण्याकामी प्रयत्न करण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख यांनाही निवेदने दिली आहेत. तर १५/८/२00९ रोजी कामेरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये गावातील व परिसरातील लोकांना प्रत्येक कामासाठी इस्लामपूरला जावे लागू नये म्हणून नवीन कामेरी तालुका करावा व तालुक्याचे ठिकाण कामेरी गावात व्हावे, याबाबतचा ठराव करण्यात आला आहे.
कामेरी तालुका होण्यासाठी सर्वती कागदपत्रे योग्य नमुन्यामध्ये शासनाकडे पाठविली असल्याने लवकरच वाळवा तालुक्याचे विभाजन होऊन कामेरी तालुका अस्तित्वात येईल, असा विश्वास हळदे-पाटील यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)


कामेरी तालुका कधी अस्तित्वात येईल?
कामेरी तालुक्यात नेमक्या कोणत्या गावांचा समावेश असावा, त्याचा नकाशा, इस्लामपूर-कामेरी अंतर ४ कि. मी. असताना नवीन तालुका होण्याकामी ग्रामसभेचा ठराव, समाविष्ट गावांची संमती आहे का? याचा अहवाल मंडल अधिकारी, तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे.