शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

राष्ट्रवादीची बाजार समिती, जिल्हा परिषदेसाठी मोर्चेबांधणी, काँग्रेस-भाजप अंतर्गत वादातच व्यस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 13:22 IST

जिल्ह्यातील दहा पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाल १३ मार्चला तर जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाल २१ मार्चला संपत आहे

अशोक डोंबाळेसांगली : जिल्हा परिषद, दहा पंचायत समित्या आणि सांगली बाजार समितीची निवडणूक येत्या दोन महिन्यात आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील काँग्रेस, भाजप, शिवसेनेतील दिग्गज नाराजींना राष्ट्रवादीत खेचत आहेत. काँग्रेस, भाजपचे नेते अंतर्गत मतभेदातच व्यस्त असूनही त्यांच्याकडून पक्षाची बांधणी होताना दिसत नाही.

जिल्ह्यातील दहा पंचायत समिती सभापती, उपसभापती आणि सदस्यांचा कार्यकाल दि. १३ मार्चला तर जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्यांचा कार्यकाल दि. २१ मार्चला संपत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या ताब्यात असतील तरच जिल्ह्यात पक्षाची मजबूत बांधणी करण शक्य असल्याचे ओळखून जयंत पाटील यांनी वाळवा, मिरज, जत, खानापूर, शिराळा, आटपाडी, पलूस, कडेगाव, कवठेमहांकाळ तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुुरू केली असून काँग्रेस, भाजपमधील अनेकांना ते राष्ट्रवादीत खेचण्याच्या तयारीत आहेत. आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, कवठेमहांकाळचे माजी मंत्री अजितराव घोरपडे, जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप या तीन नेत्यांना जिल्हा परिषद, बाजार समिती निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत आणण्यासाठी हालचाली सुरू आहेत.घोरपडे सोमवारी पाटील यांच्या गाडीतच होते. शासकीय विश्रामगृहावर गोपनीय बैठक झाली. देशमुखांनाही राष्ट्रवादीने निमंत्रण दिले असून अमरसिंह देशमुखांकडून हिरवा कंदील आहे. पण, राजेंद्रअण्णांनी मात्र सावध पवित्रा घेतला आहे. जगताप भाजपमध्ये असले तरीही त्यांचे जयंत पाटील यांच्याशी संबंध चांगले आहेत.सध्या जतमध्ये राष्ट्रवादीकडे सक्षम नेतृत्व नसल्यामुळे जगताप यांना खेचण्यासाठी पाटील यांचे प्रयत्न चालू आहेत. जगताप नाही म्हणत असले तरीही जिल्हा परिषद, बाजार समिती निवडणुकीत ते पाटील यांच्या बरोबरच असतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.राष्ट्रवादीकडून राजकीय हालचाली वेगवान चालू असतांना काँग्रेस, भाजप मात्र आजही अंतर्गत मतभेदातच व्यस्त आहेत. या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते नेत्यांच्या भूमिकेमुळे गोंधळात आहेत. काँग्रेसचे नेते व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील अतंर्गत मतभेद बाजूला ठेऊन जिल्ह्यात पक्ष बांधणीसाठी प्रयत्न करणार आहेत का? असा कार्यकर्त्यांकडूनच प्रश्न उपस्थित होत आहेत.भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, खासदार संजयकाका पाटील यांचे मनोमिलन होत नसल्यामुळे त्यांचे एकला चलोरे, अशाच भूमिकेत आहेत. माजीमंत्री शिवाजीराव नाईक आणि जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख, वाळव्यात राहुल महाडीक, सम्राट महाडीक यांनी मात्र शिराळा, वाळवा तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे.शिवसेना, 'स्वाभिमानी'कडूनही तयारी

शिवसेनेकडून आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी शक्तीने लढण्यासाठी तयारी ठेवली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही मिरज, तासगाव, वाळवा, पलूस तालुक्यातील काही जागांवर निवडणूक लढविण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची निर्णायक भूमिका असणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषदpanchayat samitiपंचायत समितीElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेस