शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

राष्ट्रवादीची बाजार समिती, जिल्हा परिषदेसाठी मोर्चेबांधणी, काँग्रेस-भाजप अंतर्गत वादातच व्यस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 13:22 IST

जिल्ह्यातील दहा पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाल १३ मार्चला तर जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाल २१ मार्चला संपत आहे

अशोक डोंबाळेसांगली : जिल्हा परिषद, दहा पंचायत समित्या आणि सांगली बाजार समितीची निवडणूक येत्या दोन महिन्यात आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील काँग्रेस, भाजप, शिवसेनेतील दिग्गज नाराजींना राष्ट्रवादीत खेचत आहेत. काँग्रेस, भाजपचे नेते अंतर्गत मतभेदातच व्यस्त असूनही त्यांच्याकडून पक्षाची बांधणी होताना दिसत नाही.

जिल्ह्यातील दहा पंचायत समिती सभापती, उपसभापती आणि सदस्यांचा कार्यकाल दि. १३ मार्चला तर जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्यांचा कार्यकाल दि. २१ मार्चला संपत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या ताब्यात असतील तरच जिल्ह्यात पक्षाची मजबूत बांधणी करण शक्य असल्याचे ओळखून जयंत पाटील यांनी वाळवा, मिरज, जत, खानापूर, शिराळा, आटपाडी, पलूस, कडेगाव, कवठेमहांकाळ तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुुरू केली असून काँग्रेस, भाजपमधील अनेकांना ते राष्ट्रवादीत खेचण्याच्या तयारीत आहेत. आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, कवठेमहांकाळचे माजी मंत्री अजितराव घोरपडे, जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप या तीन नेत्यांना जिल्हा परिषद, बाजार समिती निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत आणण्यासाठी हालचाली सुरू आहेत.घोरपडे सोमवारी पाटील यांच्या गाडीतच होते. शासकीय विश्रामगृहावर गोपनीय बैठक झाली. देशमुखांनाही राष्ट्रवादीने निमंत्रण दिले असून अमरसिंह देशमुखांकडून हिरवा कंदील आहे. पण, राजेंद्रअण्णांनी मात्र सावध पवित्रा घेतला आहे. जगताप भाजपमध्ये असले तरीही त्यांचे जयंत पाटील यांच्याशी संबंध चांगले आहेत.सध्या जतमध्ये राष्ट्रवादीकडे सक्षम नेतृत्व नसल्यामुळे जगताप यांना खेचण्यासाठी पाटील यांचे प्रयत्न चालू आहेत. जगताप नाही म्हणत असले तरीही जिल्हा परिषद, बाजार समिती निवडणुकीत ते पाटील यांच्या बरोबरच असतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.राष्ट्रवादीकडून राजकीय हालचाली वेगवान चालू असतांना काँग्रेस, भाजप मात्र आजही अंतर्गत मतभेदातच व्यस्त आहेत. या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते नेत्यांच्या भूमिकेमुळे गोंधळात आहेत. काँग्रेसचे नेते व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील अतंर्गत मतभेद बाजूला ठेऊन जिल्ह्यात पक्ष बांधणीसाठी प्रयत्न करणार आहेत का? असा कार्यकर्त्यांकडूनच प्रश्न उपस्थित होत आहेत.भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, खासदार संजयकाका पाटील यांचे मनोमिलन होत नसल्यामुळे त्यांचे एकला चलोरे, अशाच भूमिकेत आहेत. माजीमंत्री शिवाजीराव नाईक आणि जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख, वाळव्यात राहुल महाडीक, सम्राट महाडीक यांनी मात्र शिराळा, वाळवा तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे.शिवसेना, 'स्वाभिमानी'कडूनही तयारी

शिवसेनेकडून आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी शक्तीने लढण्यासाठी तयारी ठेवली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही मिरज, तासगाव, वाळवा, पलूस तालुक्यातील काही जागांवर निवडणूक लढविण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची निर्णायक भूमिका असणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषदpanchayat samitiपंचायत समितीElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेस