शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मासाळवाडी कालवा छत्तीस वर्षे कोरडाच!

By admin | Updated: November 23, 2014 23:53 IST

‘पाटबंधारे’चे दुर्लक्ष : आंदोलनाचा इशारा

आटपाडी : मासाळवाडी (ता. आटपाडी) येथील शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून २ कि.मी. कालवा तयार केला आहे. मात्र पाटबंधारे विभागाच्या बेफिकीर कारभारामुळे गेली ३६ वर्षे या कालव्यातून अद्याप पाणी सोडण्यात आलेले नाही. तात्काळ पाणी सोडण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मासाळवाडीच्या सरपंच सौ. राणी मासाळ यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
१९७६ मध्ये मासाळवाडीतील शेतकऱ्यांनी आटपाडी तलावाचे पाणी शेतीला मिळण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे मागणी केली होती. पाटबंधारे विभागाने तेव्हा अंदाजपत्रक तयार केले; पण पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. म्हणून मग शासनाच्या निधीची वाट न पाहता शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून बिरोबा मंदिर ते दार्इंगडे वस्तीपर्यंत कालव्याची खुदाई केली. तिथंपर्यंत आटपाडी तलावाच्या कालव्याचे पाणी येत आहे.
सध्या आटपाडी तलाव भरून पाणी ओढ्याने वाहून वाया जात आहे. पाणी वाया जाण्याऐवजी कालव्यात सोडून शेतीला देण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पाटबंधारे विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यास कालव्याचे आणखी काही काम करावे लागल्यास या विभागाच्या अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी लोकवर्गणी काढून कालव्याची खुदाई करण्याची तयारी शेतकऱ्यांनी दाखवली आहे. पाणी सोडल्यास १०० हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे. याबाबत सरपंच सौ. मासाळ, भगवान दार्इंगडे, आत्माराम दार्इंगडे, महादेव मासाळ, बाळासाहेब मासाळ, अण्णा मेटकरी यांनी तहसीलदार जोगेंद्र कट्यारे यांना भेटून निवेदन दिले आहे. (वार्ताहर)..


लोकवर्गणीतून कालव्याचे काम
आटपाडी तलावाचे पाणी शेतीला मिळण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे मागणी केली होती. पाटबंधारे विभागाने तेव्हा अंदाजपत्रक तयार केले; पण पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. म्हणून मग शासनाच्या निधीची वाट न पाहता शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून बिरोबा मंदिर ते दार्इंगडे वस्तीपर्यंत कालव्याची खुदाई केली.