शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
3
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
4
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
5
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
6
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
9
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
10
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
11
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
12
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
13
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
14
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
15
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
16
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
17
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
18
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
19
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
20
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
Daily Top 2Weekly Top 5

शेतमजूर झाले शेर, शेतकरी सव्वाशेर..!

By admin | Updated: December 2, 2014 23:33 IST

प्रश्न मजुरीचा : इस्लामपुरात संघर्ष टोकाला

अशोक पाटील - इस्लामपूर -सध्या इस्लामपूर आणि परिसरात कामगार आणि शेतमजुरांची टंचाई भासत आहे. त्यामुळे जे शेतमजूर आहेत ते कामावर येताना शेतकऱ्यांवरच शिरजोरी करत आहेत. त्यामुळे उरुण परिसरातील काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संघटना स्थापन केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मजुरांची कामावर येण्याची वेळ आणि मजुरी निश्चित केली आहे. हे ज्या मजुरांना मान्य असेल त्यांनाच काम दिले जात आहे. त्यामुळे शेतकरी आणि मजुरांतील संघर्ष टोकाला गेला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून उरुण परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतमजुरांना काही अटी घातल्या आहेत. त्यामुळे गेले दोन दिवस या दोघांमध्ये संघर्ष पेटला आहे. सोमवार, दि. १ रोजी संभूआप्पा मठात शेतकरी आणि मजुरांची बैठक झाली. यामध्ये शेतकऱ्यांनी आपली बाजू मांडली, तर महागाईच्या काळात मजुरी कशी परवडत नाही, याचा खुलासा महिलांनी धाडसाने केला. त्यामुळे या बैठकीत मोठा गोंधळ उडाला होता.
सध्या ऊसतोडणी सर्वत्र सुरू आहे. पूर्वी ऊस तोडणीसाठी नगर जिल्ह्यातील मजुरांचा तांडा येत होता. त्यानंतर बीड जिल्ह्यातील मजुरांची हुकूमशाही निर्माण झाली. त्यांच्या मुकादमांनी या भागातील बऱ्याच ऊस वाहतूक ठेकेदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. याच व्यवहारामुळे बीड जिल्ह्यातील बहुतांशी कामगार या भागात फिरकत नाहीत. त्यामुळे स्थानिक मजुरांसह कर्नाटक भागातील कामगार ऊस तोडणीसाठी आले आहेत. परंतु हे कामगार तोडणीसाठी शेतकऱ्यांची लुबाडणूक करत आहेत. त्यातच इतर शेतीकामासाठी शेतमजूर मिळणे कठीण झाले आहे.
जागा, पैसे देऊन मजुरांना आपल्या शेतात कामावर नेण्याचे प्रकार सर्रास वाढले असून, यातून वादावादीचेही प्रकार घडत आहेत. याचाच फायदा सध्या शेतमजूर घेत असून, कमी वेळेत जास्त मोबदला मागण्यासाठी या मजुरांनी उरुण परिसरातील शेतकऱ्यांनी केलेल्या नियमावलीला विरोध दर्शवला आहे. यामुळे त्यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

शेतकरी आणि शेतमजूर हे एका गाडीची दोन चाके आहेत. शेतमालाला भाव आणि मजुरांना जादा हजेरी मिळण्यासाठी दोघांनी एकत्र येणे गरजेचे आहे. शेतमालाला दर मिळत नाही, परंतु त्यापासून होणाऱ्या पदार्थांच्या किमती अवाढव्य आहेत. उत्पादन कमी झाले तरीही शेतमजुरीचे दर कमी नाहीत.
-विश्वासराव पाटील, माजी उपाध्यक्ष, राजारामबापू पाटील कारखाना.


शेतमजुरांना किमान वेतन कायदा लागू आहे. शासनाने ठरवून दिलेल्या वेतनापेक्षा कमी वेतन देणे कायद्याने गुन्हा आहे. इस्लामपुरातील निनावी काढलेल्या दरपत्रकाची आपण रितसर चौकशी करू. यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- नितीन पाटणकर, सहायक कामगार आयुक्त, सांगली



दरपत्रकामुळेच निर्माण झाला वाद
उरुण—इस्लामपूर परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नियमबाह्य शेतकामगारांची वेळ व दरपत्रक ठरविले आहे. पण हे कामगारांना मान्य नाही. त्यामुळे शेतकरी व कामगार वर्गात संघर्ष उफाळला आहे. इस्लामपूर येथे सोमवारी शेतकऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत शेतमजूर महिलांनी ठिय्या धरला होता.