शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पुढारीपणावरून मोहनशेठ-संजयकाकांमध्ये जुंपली

By admin | Updated: April 17, 2015 00:03 IST

शाब्दिक टोलेबाजी : काँग्रेस-भाजपमधील खेचाखेची कायम, सांगलीतील कार्यक्रमात संघर्षाचे दर्शन

सांगली : सहकारातील दुरवस्थेवरून जिल्ह्यातील काँग्रेस-भाजपमधील टोलेबाजी गुरुवारीही सुरूच राहिली. मोहनराव कदम, पतंगराव कदम यांनी सहकाराची वाट लावली, अशा शब्दात जतचे भाजपचे आमदार विलासराव जगताप यांनी आठ दिवसांपूर्वी केलेल्या आरोपाचे पडसाद साखर कामगारांच्या मेळाव्यातही उमटले. या मेळाव्यात ‘काहीजणांना आयते पुढारीपण मिळाले आहे,’ असा टोला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी लगावताच भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी, ‘आता राजकारणात नवी पिढी आली आहे, त्यांचे पाय मागे ओढू नका’, असा सल्ला दिला. अर्थात ही टोलेबाजी एकमेकांचे नाव न घेता झाली.
येथील वसंत कामगार भवनमध्ये साखर कामगारांचा मेळावा झाला. या मेळाव्यात मनोगतामध्ये मोहनराव कदम म्हणाले की, आपण एकेकाळी महिना तीस रुपये पगारावर कारखान्यात काम केले आहे. कामगारांची दुखणी मला माहीत आहेत. त्यामुळेच सहकारात मी काम करू शकलो. कामगारांना न्याय देऊ शकलो. काहीजणांना आयते पुढारीपण मिळते. त्यांनी कोणताही मतभेद न ठेवता कामगारांच्या हितासाठी काम करावे.
वस्तुत: हा टोला त्यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला होता. मात्र तो खा. पाटील यांना लागला असावा. तोच धागा पकडून खा. पाटील म्हणाले की, आता राजकारणात नवी पिढी आली आहे. मोदींची लाट आली आहे. अर्थात हा बदल लोकांनीच घडवून आणला आहे. सामान्य कार्यकर्ते व नव्या पिढीला नावे न ठेवता त्यांना बळ देण्याचे काम आता ज्येष्ठांनी केले पाहिजे. केवळ टीका करून प्रगती होणार नाही. झालेला बदल स्वीकारा.
आठ दिवसांपूर्वी आ. जगताप यांनी सांगलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी मंत्री आ. पतंगराव कदम आणि मोहनराव कदम यांच्यामुळेच जिल्ह्यातील सहकाराची वाट लागली असून, द्वेषापोटीच सहकारी कारखाने, बँका, बाजार समित्यांवर प्रशासक नियुक्त करून चौकशीचा कट करण्यात आल्याची टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना मोहनराव कदम म्हणाले होते की, लबाड लोकांनी आमच्याबद्दल बोलू नये. कुबड्या घेऊन कधी मी राजकारण केले नाही. सहकारी संस्थांवर प्रशासक नियुक्तीवेळी सहकारमंत्री कोण होते, याचा अभ्यास संबंधितांनी करावा. त्यानंतरही जगताप आणि कदम गटात खेचाखेची कायम राहिली. गुरुवारच्या मेळाव्यातील खा. पाटील आणि मोहनराव कदम यांच्यातील शाब्दिक द्वंद्वाला जगताप-कदम यांच्यातील वादाचीच किनार होती. (प्रतिनिधी)