शहरं
Join us  
Trending Stories
1
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
4
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
5
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
6
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
7
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
8
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
10
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
11
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
12
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
13
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
14
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
15
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
16
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
17
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
18
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
19
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीप्रश्नी मुख्यमंत्र्यांना भेटणार

By admin | Updated: April 2, 2015 00:39 IST

विवेक कांबळे यांचा पुढाकार : सर्व महापालिकांच्या महापौरांना पत्र


सांगली : महापालिका हद्दीतील एलबीटी एक आॅगस्टपासून रद्द झाल्यानंतर पालिकेची आर्थिक स्वायत्तता धोक्यात येणार आहे. या प्रश्नावर राज्यातील सर्व महापालिकांचे महापौर, उपमहापौरांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी महापौर विवेक कांबळे यांनी पुढाकार घेतला आहे. राज्यातील सर्व महापालिकांच्या महापौर व उपमहापौरांना पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांसमवेतच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन कांबळे यांनी केले आहे.
राज्य शासनाने एक आॅगस्टपासून एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन अर्थसंकल्पात दिले आहे. एलबीटी लागू असलेल्या सर्वच महापालिकांची गेल्या दोन वर्षात मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. त्यात एलबीटी रद्द झाल्यानंतर ही स्थिती आणखीनच बिकट होणार आहे. शासनाकडून एलबीटीपोटीचे अनुदान कोणत्या स्वरुपात मिळणार, व्हॅटवर सरचार्ज लागू होणार असला तरी, महापालिकेची रक्कम कधी मिळणार, याची स्पष्टता झालेली नाही. त्यामुळे सर्वच महापालिकांत संभ्रमाचे वातावरण आहे.
यासंदर्भात महापौर विवेक कांबळे यांनी पुढाकार घेऊन एलबीटी लागू असलेल्या सर्वच महापालिकांच्या महापौर व उपमहापौरांना पत्र पाठविले आहे. एलबीटी रद्द झाल्यानंतर महापालिकेचे दैनंदिन कामकाज व विकास कामांवर परिणाम होणार आहे. नागरी सुविधा ते कर्मचाऱ्यांचे वेतन, अशा अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. काही व्यापारी संघटनांचे म्हणणे ऐकून राज्य शासन एकतर्फी निर्णय घेत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण होईल. स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रमुख उत्पन्नाचे स्रोत असलेल्या एलबीटीवरच शासनाकडून घाला घातला जात आहे. त्यात मुद्रांक शुल्कची रक्कम पालिकांना मिळण्यास विलंब होत आहे. एलबीटी हटवून व्हॅटचे अनुदान पालिकांना दिले जाईल, पण त्याचा कालावधी पाहता, पालिकेचा आर्थिक कणाच मोडून पडणार आहे. राज्य व केंद्र शासनाच्या अनेक योजना निधीअभावी पूर्ण होऊ शकणार नाहीत.
त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या सर्व समस्यांवर विचारविनियम केला जाणार आहे. पालिकांना अनुदानाचे स्वरुप निश्चित करण्यासाठी व पालिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले जाणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेळ मागितली आहे. त्यांची वेळ मिळताच त्या बैठकीला महाराष्ट्रातील सर्व महापौर व उपमहापौरांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही विवेक कांबळे यांनी पत्राद्वारे केले आहे. (प्रतिनिधी)