शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
लखनौच्या मैदानात पावसाचा खेळ अन् मिचेल मार्श नावाचं वादळ! सगळं संपल्यावर ठोकली विक्रमी सेंच्युरी
5
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
6
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
7
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
9
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
10
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
11
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
12
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
13
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
14
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
15
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
16
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
17
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
18
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
20
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
Daily Top 2Weekly Top 5

मालगावमध्ये आले कृष्णेचे पाणी!

By admin | Updated: April 2, 2015 00:45 IST

ग्रामस्थांचा जल्लोष : शुद्ध पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा संपली

मालगाव : मालगाव (ता. मिरज) येथील चाळीस हजार लोकसंख्येच्या गावास गेली ३५ वर्षे लागलेली शुध्द पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा अखेर राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून कृष्णेचे पाणी गावात दाखल झाल्याने संपली आहे. साडेतीन वर्र्षांत पूर्ण झालेल्या योजनेतून पाणी सोडण्यात आले. गावात दाखल झालेल्या कृष्णेच्या पाण्याचे पूजन सरपंच महावीर रुकडे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केले.पस्तीस वर्षांपूर्वी २२ गावांसाठी आरग-बेडग ही प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. या योजनेत मालगावचा समावेश होता. मात्र ही योजना फार काळ टिकली नाही. पर्यायाने मालगावसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावाने पिण्याच्या पाण्यासाठी ३५ वर्षे हाल सोसले. गावाचा पिण्याच्या पाण्याचा भार कूपनलिकांवर होता. म्हैसाळ योजनेतून पाणी सोडले तरच या कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होत असे अन्यथा ग्रामस्थांना भटकंतीशिवाय पर्याय रहात नसे.
प्रकाश उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश खोलकुंबे यांनी पाणी प्रश्न सुटावा, यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी शासनाने नव्याने राबविलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी शासनाकडे सुधारित प्रस्ताव दाखल केला. शासनाने ११ कोटी ३८ लाख रुपये खर्चाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेला मंजुरी दिली. सरपंच महावीर रुकडे, सदस्य विश्वास खांडेकर, विजय आवटी तसेच इतर पदाधिकारी, जीवन प्राधिकरणचे अधिकारी यांनी सर्व अडथळे दूर केल्याने साडेतीन वर्षात ही योजना पूर्ण झाली आहे. या योजनेतून सोडण्यात आलेले कृष्णा नदीचे पाणी जलशुध्दीकरण टाकीत दाखल झाले आहे. या योजनेच्या पाण्याचे सरपंच रुकडे यांच्याहस्ते पूजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच वहिदा शेख, सदस्य विश्वास खांडेकर, जयहिंदचे अध्यक्ष विजय आवटी, विजय आवटी, रशिद मुजावर, शिवाजी माळी, पांडुरंग पाटील, रावसाहेब माने, राम चव्हाण उपस्थित होते. (वार्ताहर)


या योजनेमुळे मालगावचा पाणीप्रश्न कायमचा सुटला आहे. या योजनेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. योजना सुरळीत चालावी, यासाठीही नियोजन करण्यात येणार असल्याचे सरपंच रुकडे यांनी सांगितले.