शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

'पतंगराव कदम मुख्यमंत्री झाले नाहीत, ही मोठी खंत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 16:57 IST

दिवंगत नेते पतंगराव कदम यांनी अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने काँग्रेसला उभारी देण्याचे काम केले

विटा : दिवंगत नेते पतंगराव कदम यांनी अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने काँग्रेसला उभारी देण्याचे काम केले. पक्षानेही अनेक जणांना मोठी पदे दिली आहेत. परंतु, पक्षासह सर्वसामान्यांसाठी झटणारे पतंगराव कदममुख्यमंत्री झाले नाहीत, ही खंत आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या आणि जम्मू-काश्मीरच्या प्रभारी खासदार रजनीताई यांनी व्यक्त केले.

बामणी-पारे (ता. खानापूर) येथील उदगिरी साखर कारखान्याच्या १० व्या गळीत हंगामाचा प्रारंभ मंगळवारी खा. पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी आ. मोहनराव कदम, संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम, अध्यक्ष डॉ. राहुल कदम, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी विभागप्रमुख कमलाकर पाटील, माजी कुलगुरू डी. पी. साबळे, पूर्ण वेळ संचालक उत्तम पाटील उपस्थित होते.

खासदार पाटील म्हणाल्या, की दुष्काळी भागातील उदगिरी शुगर कारखाना अत्यंत चांगल्याप्रकारे सुरू आहे. भविष्यात तंत्रज्ञान आणि विज्ञानाची गाठ घालून कारखाने चालवावे लागतील.

डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, की दुष्काळी खानापूर तालुक्यासह परिसराचा विकास व्हावा या उद्देशाने उदगिरी कारखान्याची उभारणी केली आहे. एफआरपी हा शेतकऱ्यांचा आत्मा आहे. त्यामुळे एफआरपीचा एक पैसाही बुडविला नाही. हमीभावापेक्षा आतापर्यंत ६८ कोटी रुपये जादा दिले आहेत.

अध्यक्ष डॉ. राहुल कदम म्हणाले की, पाणी व ऊस नसलेल्या भागात उदगिरी कारखान्याची उभारणी करून सुरुवातीला टँकरने पाणी आणून तीन हंगाम पूर्ण केले. आता तोच कारखाना प्रगतिपथावर असून खासगी साखर कारखान्यांच्या यादीत उदगिरी अव्वलस्थानी आहे.

या कार्यक्रमास सुभाष पाटील, दादामहाराज नगरकर, गोविंद रूपनर, मालन मोहिते, रवींद्र देशमुख, नंदकुमार पाटील, रामरावदादा पाटील, जयहिंद साळुंखे, के. डी. जाधव उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीPatangrao Kadamपतंगराव कदमChief Ministerमुख्यमंत्रीcongressकाँग्रेस