शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
2
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
3
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
4
आदिल खानने राखी सावंतच्या आजाराला म्हटलं 'ढोंग'; कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेमची केली पोलखोल
5
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
6
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
7
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
8
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
9
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
10
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
11
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
12
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
13
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
14
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
15
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
16
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
17
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
18
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
19
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
20
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला

सांगलीत काळया खणीचा इतिहासाचा फलक झळकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 11:20 AM

Muncipal Corporation Water Sangli- सुशोभिकरण करत असताना काळया खणीचा इतिहासाचा फलक सांगलीतील आपटा पोलीस चौकी ते पुष्पराज चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या दोनशे वर्ष जुन्या असलेल्या काळी खणीवर महापालिकेने लावला आहे. या फलकामुळे नागरिकांचे याकडे लक्ष वेधले जात आहे.

ठळक मुद्देसांगलीत काळया खणीचा इतिहासाचा फलक झळकलामहापालिकेचा खणीच्या सुशोभीकरणासाठी पुढाकार

सुरेंद्र दुपटेसंजयनगर/सांगली ः सुशोभिकरण करत असताना काळया खणीचा इतिहासाचा फलक सांगलीतील आपटा पोलीस चौकी ते पुष्पराज चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या दोनशे वर्ष जुन्या असलेल्या काळी खणीवर महापालिकेने लावला आहे. या फलकामुळे नागरिकांचे याकडे लक्ष वेधले जात आहे.आयुक्त नितीन कापडणीस यांनी या खणीच्या सुशोभीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. या फलकावर असा मजकूर लिहिला आहे, काळी खण ही दोनशे वर्षांपूर्वीचा पाण्याचा जुना स्त्रोत्र आहे. इसवी सन १७९९ च्या सुमाराला सांगली आणि मिरज संस्थांच्या दोन वाटण्या झाल्या. त्यावेळी सांगली हे थोरले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्याकडे आले. त्यांनी हे शहर संस्थानिक राजधानी करण्याचे निश्चित करून ते सुनियोजित पद्धतीने वसवण्याचे ठरवले.

राजधानीसाठी आवश्यक सर्व प्रशासकीय इमारती, नागरिकासाठी घरे, गणेश दुर्ग, किल्ला नदीकाठावरील गणेश मंदिर ,यासाठी मोठ्या प्रमाणात दगडाचे आवश्यकता होती आणि हा दगडाचा पुरवठा सांगली गावाजवळच मिळेल का ? याचा शोध चिंतामणराव यांनी घेतला.

या वेळी सांगलीच्या पूर्व बाजूला असलेल्या सध्या काळी खण या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भागांमधील जमिनीच्या भूगर्भातील कठीण असा काळा दगड त्यांना आढळून आला. त्यामुळे नवीन राजधानीसाठी लागणाऱ्या बांधकामासाठी दगडाची गरज गावाजवळच पूर्ण झाल्याने त्यांनी याठिकाणी खण तयार केली. त्यातून मोठ्या प्रमाणात काळा दगड बाहेर काढण्यात आले. त्या दगडातून सांगली शहराच्या तत्कालीन अनेक इमारती घरे, उभी राहिली.मोठ्या संख्येने खाणकाम केल्याने या ठिकाणी मोठा खड्डा निर्माण झाला. त्यात पाणी साठल्याने याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. पुढे राजधानीसाठी लागणाऱ्या सर्व इमारतीची गरज पूर्ण झाल्यावर ही खण तशीच पडून राहिली. त्यामध्ये पावसाचे पाणी साठून राहिले, तसेच भुगर्भातूनही पाण्याचे झरे मिळत गेले. त्यामुळे या जागेला तळ्याचे स्वरूप आले. काळ्या दगडाची खण म्हणून ती काळी खण या नावाने ओळखली जाऊ लागली. आता सुशोभीकरणात याबाबतचा इतिहास सांगणारा फलक महानगरपालिकेने काळा खणीत लावला आहे. याकडे नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे.

गणेश मंदिर, गणेश दुर्गच्या तटबंदीसाठी याच खणीतून आणला दगड 

विशेष म्हणजे गणेश दुर्ग या मोठ्या भुईकोट किल्ल्याच्या दगडी तटबंदीसाठी त्यांनी याच काळया खणीच्या दगडाचा वापर केला. सांगलीतील गणेश मंदिरासाठी काही दगड जोतिबा डोंगरावरून मागवण्यात आले होते मात्र अन्य कामासाठी लागणारा दगड याच खणीतून आणला होता.

पद्मभूषण शहा यांनी काढलेले चित्र फलकावर पद्मभूषण डॉक्टर विजयकुमार शहा यांनी १९५८ मध्ये कॉलेजमध्ये शिकत असताना काळया खणीचे काढलेले चित्र या फलकावर लावले गेले आहे.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाwater scarcityपाणी टंचाईSangliसांगली