शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

घनकचराप्रश्नी आज दिल्लीत सुनावणी

By admin | Updated: April 20, 2015 00:03 IST

कोल्हापूरच्या प्रकल्पाबाबत महापालिका फारशी उत्सुक नाही. त्यासंदर्भातही म्हणणे मांडले जाण्याची शक्यता आहे.

सांगली : घनकचऱ्याच्या प्रश्नावर सोमवारी महापालिकेच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडली जाणार आहे. पालिकेकडून आर्थिक स्थितीचा लेखाजोखाही सादर होईल. त्यानंतर न्यायालय किती रक्कम भरायची? याचा फैसला देणार आहे. या सुनावणीकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. गेल्या पंधरा वर्षांत घनकचऱ्याकडे पालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. त्याचा मोठा फटका बसला आहे. जिल्हा सुधार समितीने घनकचरा प्रकल्पासाठी हरित न्यायालयात याचिका दाखल केली. हरित न्यायालयाने महापालिकेला ६० कोटी रुपये विभागीय आयुक्तांकडे जमा करण्याचे आदेश देताना, बरखास्तीचा इशाराही दिला होता. या निकालाने पालिका प्रशासन व नगरसेवक हादरले. महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण सर्वोच्च न्यायालयानेही स्थगितीस नकार देत, पैसे भरण्याचे नियोजन सादर करण्याचे आदेश दिले. आयुक्त अजिज कारचे, उपायुक्त डॉ. प्रशांत रसाळ व लेखापाल अशोक चौगुले हे तिघे दिल्लीकडे रवाना झाले आहेत. सोमवारी या याचिकेवर सुनावणी होणार असून, पालिका किती रक्कम भरणार, याचे नियोजन सादर करणार आहे. सध्या पालिकेची आर्थिक स्थिती पाहता, एकाचवेळी ६० अथवा ३० कोटी रुपये भरता येणार नाहीत, त्यासाठी हप्ते बांधून देण्याची मागणी केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आठ ते दहा कोटी रुपये भरण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. उर्वरित रकमेसाठी हप्ते घेतले जाणार आहेत. त्यातच विभागीय आयुक्तांनी कोल्हापूरच्या धर्तीवर घनकचरा प्रकल्प राबविण्याचे आदेश दिले आहेत. कोल्हापूरच्या प्रकल्पाबाबत महापालिका फारशी उत्सुक नाही. त्यासंदर्भातही म्हणणे मांडले जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)