शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीचे शासकीय वसतिगृह अखेर टॅँकरमुक्त

By admin | Updated: December 9, 2014 23:26 IST

चार वर्षांनंतर पाण्याची सोय : ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा सुरळीत, विद्यार्थ्यांमध्ये समाधान::लोकमतचा दणका

अविनाश बाड :आटपाडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात आज मंगळवारी तब्बल चार वर्षांनंतर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. आठवड्यातून येणाऱ्या टॅँकरवर विद्यार्थी अवलंबून राहिल्याने कायमच्या पाणीटंचाईने वैतागून गेले होते. आता पुजारवाडी (आटपाडी) ग्रामपंचायतीने मुख्य जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे आता पाण्याअभावी बंद पडलेली सौरऊर्जा यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे.
माणगंगा साखर कारखान्याजवळ कौठुळी फाट्यावर समाज कल्याण विभागाने मुलांसाठी आणि मुलींसाठी तब्बल साडेसात कोटी रुपये खर्चून वसतिगृह बांधले आहे. आटपाडीपासून सुमारे ३ कि. मी. अंतरावर असलेल्या या वसतिगृहात पाण्याची कसलीही सोय नसल्याने पाण्याअभावी विद्यार्थ्यांचे हाल सुरू होते. आठवड्यातून एकदा पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर मागविला जायचा. टॅँकरचालक जिथून शक्य असेल तेथून आणि उपलब्ध होईल तसले पाणी आणून ओतायचा. उघड्यावर ठेवलेल्या टाकीत टॅँकरचे पाणी सोडल्यावर पिण्यासाठी, अंघोळीसाठी पाणी वापरताना, पुरविताना विद्यार्थ्यांची कसरत सुरू होती. ‘लोकमत’ने यावर प्रकाशझोत टाकला. मुलांनीही पाण्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. समाजकल्याण विभागाचे सहआयुक्त दीपक घाटे यांनी भेट दिली आणि वसतिगृहातील प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. पाणीटंचाई संपुष्टात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

गरम पाणीही मिळणार!
मुलांना अंघोळीसाठी गरम पाणी देण्यात यावे, यासाठी वसतिगृहाच्या छतावर मोठी सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यात आली आहे. ४ वर्षे पाण्याअभावी ही यंत्रणा बंद आहे. आता वरच्या टाकीत पाणी सोडून ही यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे चार वर्षांनंतर वसतिगृहाच्या स्नानगृहातील ‘शॉवर’ला गरमा-गरम पाणी येणार आहे.