शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

शेततळ्यामध्ये मत्स्यसंवर्धन पथदर्शी प्रकल्पामुळे  मत्स्य पालनास चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 14:15 IST

सांगली जिल्हा नियोजन विकास समिती सन 2019-20 योजनेंतर्गत नाविन्यपूर्ण बाबीमधून शेततळ्यामध्ये मत्स्यसंवर्धन करण्यात येणार आहे. या योजनेमुळे शासकिय किंवा वैयक्तिक खर्चातून तयार करण्यात आलेल्या शेततळ्यामध्ये मत्स्यसंवर्धन करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी निर्माण केलेल्या तळ्यांमध्ये सुविधेच्या माध्यमातून उत्पादन वाढीस चालना मिळणार आहे.

ठळक मुद्देशेततळ्यामध्ये मत्स्यसंवर्धन पथदर्शी प्रकल्पामुळे  मत्स्य पालनास चालना शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीस चालना : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : जिल्हा नियोजन विकास समिती सन 2019-20 योजनेंतर्गत नाविन्यपूर्ण बाबीमधून शेततळ्यामध्ये मत्स्यसंवर्धन करण्यात येणार आहे. या योजनेमुळे शासकिय किंवा वैयक्तिक खर्चातून तयार करण्यात आलेल्या शेततळ्यामध्ये मत्स्यसंवर्धन करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी निर्माण केलेल्या तळ्यांमध्ये सुविधेच्या माध्यमातून उत्पादन वाढीस चालना मिळणार आहे.

साधारणत: १०० ७ १०० फूट शेततळ्यामध्ये मत्स्यसंवर्धन केल्यास जवळपास एक ते दीड लाख रूपये उत्पन्न मिळते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे या शासनाच्या धोरणाशी ही योजना सुसंगत असून हा पथदर्शी प्रकल्प राबविल्यामुळे शेततळ्यातील मत्स्य पालनास चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मिरज तालुक्यातील बेडग व एरंडोली येथील मत्स्यसंवर्धन केलेल्या शेततळ्यांची प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, तालुका कृषि अधिकारी प्रदीप कदम, आत्माचे जिल्हा समन्वयक मुकुंद जाधवर, तासगाव तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विवेक कुमार पाटील, अविनाश एकंडे, तानाजी नलवडे, रविंद्र शेळके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, जिल्ह्यात ज्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात शेततळे, शेततळ्यांना अस्तरीकरण केलेले आहे अशा निवडक गावामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत शेततळ्यामध्ये मत्स्यपालन हा नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी ९५ लाख रूपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून यामध्ये ५४ लाख रूपये शासन हिस्सा आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीमुळे आत्मा अंतर्गत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचे मत्स्यसंवर्धनाच्या पूरक उद्योगातून उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. ही योजना आत्मा अंतर्गत शेतीगटांमार्फत राबवण्यात येत असून योजनेचा संपूर्ण लाभ हा गटाला देणे अपेक्षित असून हा निधी गटाच्या खात्यावर देण्यात येणार आहे.जिल्ह्यात आत्माअंतर्गत सन 2018-19 मध्ये शेततळ्यामध्ये मत्स्यपालन शेतीशाळा प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आली होती त्यास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये माशांची वाढ चांगली झाली असून ९ ते ११ महिन्यामध्ये दीड ते दोन किलो वजनाचे मासे तयार झालेले आहेत.

या अनुभवाचा वापर करून जिल्ह्यातील चार ते पाच तालुक्यातील प्रत्येकी एक ते दोन गावाची निवड करून प्रत्येक गावात किमान १०० शेततळ्यांमध्ये मत्स्यपालनास चालना देवून अतिरिक्त उत्पादनातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी मिरज व तासगाव तालुक्यातील गावे निवडून २०० शेततळ्यांकरीता शेततळ्यातील मत्स्यपालन नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत चालू वर्षात ९५ लाख रूपयांची मान्यता देण्‍यात आली असल्याचे जिल्हाधिकारीडॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, ही योजना आत्मा अंतर्गत शेतीगटामार्फत राबविण्यात येत असून प्रति गट २० शेतकरी याप्रमाणे मिरज तालुक्यात ८ गट तर तासगाव तालुक्यात २ गट स्थापन केले आहेत. असे एकूण २०० शेतकरी सहभागी झाले आहेत. मत्स्यपालनाबाबत गट प्रमुखांना सिंधुदूर्ग व पुणे येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच आत्मा कार्यालयाच्या वतीने प्रत्येक टप्प्यावर शेतीशाळा घेवून या शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.बेडग येथील रामचंद्र खाडे, रामचंद्र गडदे, राजाराम खरात व एरंडोली येथील शिवशांत दळवी यांच्या मत्स्यसंवर्धन केलेल्या शेततळ्यांची पाहणी करून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी शेततळ्यामध्ये मत्स्यसंवर्धनासाठी मत्स्यबीज, जाळी, मत्स्यखाद्य यासाठी ५० टक्के अनुदान मिळत असल्यामुळे तसेच मत्स्यपालनातून चांगले उत्पन्न मिळण्याबरोबरच मत्स्यसंवर्धन केलेल्या शेततळ्यातील पाणी पिकांना दिल्यामुळे त्याचा फायदा होणार असल्याचे सांगून समाधान व्यक्त केले. 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारSangliसांगली