शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

‘सोनहिरा’कडून २४०८ रुपये अंतिम दर

By admin | Updated: September 26, 2015 00:19 IST

‘एफआरपी’ ३०८ प्रमाणे जमा होणार : साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत मोहनराव कदम यांची घोषणा

वांगी : सोनहिरा सहकारी साखर कारखाना उसाला ‘एफआरपी’प्रमाणे ३०८ रुपये सोमवार, दि. २८ रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणार आहे. एकूण प्रतिटन २४०८ रुपये अंतिम दर दिला आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम यांनी केले. वांगी (ता. कडेगाव) येथे कारखान्याच्या बावीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून कदम बोलत होते.यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, जिल्हा बॅँकेचे संचालक महेंद्र लाड, युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष इंद्रजित साळुंखे, भीमराव मोहिते, राम उगळे, पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठल मुळीक, सखाराम सूर्यवंशी, प्रकाश जाधव उपस्थित होते.कदम म्हणाले की, कारखान्याने मागील गळीत हंगामात ७ लाख ४६ हजार टन उसाचे गाळप केले असून आतापर्यंत शेतकऱ्याला प्रतिटन २१०० रूपये दिले असून उर्वरित ३०८ रुपये दि. २८ रोजी जमा करणार आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ताकारी व टेंभू योजनांमुळे उसाच्या क्षेत्रात वाढ झाली असल्यामुळे गाळप क्षमता प्रतिदिनी साडेसात हजार टन करण्यात येणार आहे. आसवनी प्रकल्पाची क्षमता वाढविण्यात येणार असून ती प्रतिदिन ६० हजार लिटर करण्यात येणार आहे. उसाला जादा दर देता यावा यासाठी प्रतिदिन ६० हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या कामासाठी ९२ कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. ते म्हणाले की, कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासदांसाठी ऊस ठिबक सिंचन करण्यासाठी मदत करणार आहे. यावेळी उपाध्यक्ष बापूसाहेब पाटील, पी. सी. जाधव, डी. के. कदम, जयसिंग कदम, मधुकर सूर्यवंशी उपस्थित होते. कार्यकारी संचालक शरद कदम यांनी स्वागत केले. अनिल कदम यांनी नोटीस वाचन, तर संजय पाटील यांनी अहवाल वाचन केले. युवराज कदम यांनी आभार मानले. (वार्ताहर)शासनाने ५० टक्के दराने खते द्यावीतमहागाईमुळे शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाही. या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी रासायनिक खताचे दर ५० टक्के कमी करावेत, त्यामुळे ऊस उत्पादकांना उत्पादन खर्च कमी होऊन आर्थिक पाठबळ मिळण्यास मदत होणार आहे, असे मत मोहनराव कदम यांनी व्यक्त केले.टेंभू योजनांमुळे उसाच्या क्षेत्रात वाढ झाली असल्यामुळे गाळप क्षमता प्रतिदिनी साडेसात हजार टन करण्यात येणार आहे. आसवनी प्रकल्पाची क्षमता वाढविण्यात येणार असून ती प्रतिदिन ६० हजार लिटर करण्यात येणार आहे.यावर्षीपासून कमी क्षेत्रात जास्त ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला २५ हजार, १५ हजार व १० हजार अशी आडसाली, पूर्वहंगामी व सुरू उसासाठी बक्षिसे देण्यात येणार आहेत.