शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

वाळवा-शिराळ्यामधील मातब्बर नेत्यांची फिल्डिंग

By admin | Updated: April 20, 2015 00:03 IST

जिल्हा बँक निवडणूक : जयंतरावांना दहा जागांची अपेक्षा

अशोक पाटील- इस्लामपूर -सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. बँकेवर संचालक म्हणून जाण्यासाठी वाळवा, शिराळा तालुक्यातील मातब्बर नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे. या बँकेवर वर्णी लागावी म्हणून आमदार जयंत पाटील यांच्या समर्थकांत रस्सीखेच सुरू आहे. वाळवा व शिराळ्यातील मतदारांची संख्या पाहता, जयंत पाटील यांना १० जागांची अपेक्षा आहे. परंतु त्यांच्या पदरात ६ जागा पडतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी जिल्ह्यात एकूण २,२0७ मतदान आहे. पैकी वाळवा-शिराळ्यात ६९३ इतके मतदान आहे. याचाच अर्थ संपूर्ण जिल्हा एका बाजूला आणि वाळवा-शिराळा तालुका एका बाजूला, अशी स्थिती आहे. यामुळे जयंत पाटील यांच्या समर्थकांनी २१ पैकी १० जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. परंतु त्यांच्या पदरात वाळव्यासाठी ४ व शिराळ्यासाठी २ जागा निश्चित पडतील, अशी चर्चा आहे. या दोन्ही तालुक्यातून जवळ-जवळ ३० जणांनी आपले अर्ज दाखल केले असून, निवडणूक बिनविरोध झाल्यास यातील संचालक निश्चित करताना जयंतरावांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
जयंत पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार विलासराव शिंदे हे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आहेत. आमदार शिवाजीराव नाईक हे भाजपचे आमदार आहेत. परंतु त्यांची संस्थात्मक ताकद तोकडी आहे. जयंतरावांचे खास समर्थक दिलीपराव पाटील यांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. कोणत्याही परिस्थितीत बँकेच्या अध्यक्षपदावर जाण्यासाठी त्यांचा प्रयत्न असणार आहे.
सहकारी क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले व शिवाजीराव नाईक यांचे पूर्वाश्रमीचे कट्टर समर्थक डॉ. प्रताप पाटील हे आता जयंत पाटील यांच्या गटात असल्याने त्यांनाही संधी मिळेल. विलासराव शिंदे हेही इच्छुक असले तरी, ते सध्या तरी अपात्र यादीत असल्याने त्यांच्या गटातून कणेगावचे अ‍ॅड. विश्वासराव पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
शिराळा तालुक्यात मानसिंगराव नाईक यांच्या संस्था सक्षम आहेत. सभासद मतदानही त्यांच्या बाजूने चांगले आहे. त्यामुळे ते स्वत: जिल्हा बँकेसाठी इच्छुक आहेत. वाळवा-शिराळ्यात राष्ट्रवादीची ताकद आहे. त्याखालोखाल काँग्रेस आणि भाजपची आहे. या निवडणुकीत पक्षीय पातळीवर शिवाजीराव नाईक यांचा विचार झाल्यास, त्यांच्या पदरातही एखादी जागा जाण्याची शक्यता आहे.