शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ !

By admin | Updated: April 20, 2015 00:02 IST

पलूस तालुक्यातील स्थिती : द्राक्ष, ऊस हंगाम अंतिम टप्प्यात

किर्लोस्करवाडी : पलूस तालुक्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली असून काही भागात शेतीसाठी पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे. यामुळे पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांचे आटोकाट प्रयत्न सुरु असून पाणी उपलब्ध करण्यासाठी धावपळ सुरू आहे. तालुक्यात ऊस व द्राक्ष हंगाम जवळजवळ अंतिम टप्प्यात आहे.
पलूस तालुका सधन तालुका म्हणून ओळखला जातो. कृष्णा नदीमुळे काही अपवाद वगळता सर्वच गावात सहकारी पाणीपुरवठा योजना आहेत, तर येरळा काठावरील गावांना आरफळचे पाणी मिळू लागले आहे. पाण्याची बऱ्यापैकी सोय असल्याने शेतीचे उत्पन्नही चांगले मिळते.
एकूण २७ हजार ४४६ हेक्टरपैकी २४ हजार ६९४ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. तालुक्यात ऊस हे प्रमुख पीक आहे. कृष्णाकाठावर तर संपूर्ण उसाचीच शेती केली जाते. उसापाठोपाठ द्राक्षबागांचे क्षेत्रही आहे. पलूस, आंधळी, मोराळे, बांबवडे, कुंडल, आमणापूर, सांडगेवाडी, सावंतपूर, गोंदीलवाडी, शिवाजीनगर, घोगाव आदी गावांमध्ये द्राक्षबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे.
अलीकडे द्राक्षबागांमधील अडचणी लक्षात घेऊन काही द्राक्ष बागायतदार केळी, डाळिंब उत्पादनाकडे वळल्याचे पाहावयास मिळते. शेतीला जोडव्यवसाय म्हणून म्हैस, गाय, शेळीपालन, कुक्कुटपालन व्यवसाय येथील शेतकरी करीत आहेत.
सध्या पलूस तालुक्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. कूपनलिकांच्या तसेच विहिरींच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. उन्हामुळे पिकांना जास्त पाणी लागत आहे. वीजकपात व वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे शेतीला वेळेत पाणी मिळत नाही. तसेच ऊस हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. जास्तीचे क्षेत्र व उशिरा सुरू झालेला गळीत हंगाम यामुळे ऊस शिल्लक आहे. ऊस तोडणी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना कारखान्याकडे हेलपाटे घालावे लागत आहेत. (वार्ताहर)