शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोड मजुरांकडून शेतकऱ्यांची लूट

By admin | Updated: April 17, 2015 00:11 IST

तक्रारीची दखल नाही : एकरी दहा हजार आणि कोयत्यामागे एक किलो चिकन!

प्रमोद रावळ - आळसंद -खानापूर तालुक्यातील आळसंदसह परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसतोड मजुरांसह सर्वांनीच लूट सुरू केली आहे. एक एकर ऊस तोडणीसाठी आठ ते दहा हजारासह वाहन एन्ट्रीच्या नावाखाली ५०० रूपये व प्रति कोयता एक किलो चिकनची मागणी केली जात आहे. याबाबत शेतकऱ्यांनी साखर कारखाना प्रशासनाकडे तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. शेतकरी संघटनासुध्दा शेतकऱ्यांची बाजू मांडताना दिसत नसल्यामुळे तक्रार करायची कुणाकडे?, असा प्रश्न विचारला जात आहे.
आळसंदसह बलवडी (भा.), खंबाळे (भा.), वाझर, भाळवणी, कमळापूर, तांदळगाव आदी गावात ताकारी व आरफळ योजनेमुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. मागीलवर्षी वसंतदादा कारखान्याने ऊसबिले दिलेली नाहीत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले असतानाच, मागील माहिन्यातील अवकाळी पाऊस व त्यातच ऊसतोड मजुरांकडून होणाऱ्या आर्थिक लुटीमुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे.
साखर कारखान्यांनी चालू वर्षीच्या गळीत हंगामात सुरुवातीला कार्यक्षेत्राबाहेरचा ऊस तोडून आणला. त्यामुळे कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिले आहे. कार्यक्षेत्रातील ऊस तोडणी संपवून साखर कारखान्यांनी जास्तीत जास्त टोळ्या कार्यक्षेत्रात धाडल्या. सध्या आळसंद व परिसरात क्रांती, सोनहिरा, उदगिरी, केन अ‍ॅग्रो आदीसह कारखान्यांच्या १०० ते १५० ऊसतोड टोळ्यांची संख्या आहे.
सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्पात असून उसाचे शिल्लक क्षेत्रही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे ऊसतोडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी चिटबॉयपासून मुकादम, ऊसतोड मजूर व वाहनचालक यांच्यापुढे हात जोडताना दिसत आहेत. याचाच फायदा ऊसतोड करणाऱ्या लॉबीने घेतला आहे.
त्यासाठी शेतकऱ्यांना मात्र एक एकर उसाच्या तोडणीसाठी ऊसतोड मजुरांना आठ ते दहा हजार रूपये व प्रत्येक कोयत्यामागे एक किलो चिकन, वाहनचालकास ‘एन्ट्री’च्या नावाखाली प्रत्येक खेपेला ५०० रूपये हातावर ठेवल्याशिवाय वाहन फडातून बाहेर निघत नाही.
याबाबत शेतकऱ्यांनी साखर कारखाना प्रशासनाकडे तक्रारी देऊनही याची दखल घेतली नाही. तसेच शेतकरी संघटनेचे नेतेही याची दखल घेताना दिसत नाहीत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची खुलेआम आर्थिक लूट सुरू आहे, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.


नहवालदिल ऊस उत्पादक
ऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले असतानाच ऊसतोड मजुरांकडून होणाऱ्या आर्थिक लुटीमुळे शेतकरी पुरता हैराण झाला असून चिटबॉयपासून मुकादम, ऊसतोड मजूर व वाहनचालक यांच्यापुढे हात जोडताना दिसत आहेत. शेतकऱ्यांना एक एकर उसाच्या तोडणीसाठी मजुरांना आठ ते दहा हजार रूपये व प्रत्येक कोयत्यामागे एक किलो चिकन, वाहनचालकास ‘एन्ट्री’च्या नावाखाली प्रत्येक खेपेला ५०० रूपये हातावर ठेवल्याशिवाय वाहन फडातून बाहेर निघत नाही. कारखाना प्रशासनाकडे शेतकऱ्यांनी तक्रारी देऊनही याची दखल घेतली जात नाही.