शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्तीवर कार्यक्षम व्यवस्थापन हव

By admin | Updated: December 5, 2014 23:21 IST

पतंगराव कदम : कडेगाव येथे तीनदिवसीय भूगोलशास्त्र परिषद सुरूे

तोंडोली : जिल्हा व तालुका पातळीवर नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी कार्यक्षम व्यवस्थापन हवे, असे प्रतिपादन भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांनी केले.
कडेगाव येथील मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयात यु.जी.सी. व महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘भारतातील नैसर्गिक आपत्ती आणि व्यवस्थापन’ या विषयावरील तीनदिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या माजी अधिष्ठाता डॉ. पी. डब्ल्यु. देशपांडे, महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाचे भूगोल विभागप्रमुख डॉ. निलाद्री दास, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. एस. डी. कुलकर्णी आदी उपस्थित होते.
कदम म्हणाले की, दुष्काळ अतिवृष्टी, भूकंप, भूस्खलन यासारख्या अनेक नैसर्गिक आपत्तींना मानवाला सामोरे जावे लागते. माळीण दुर्घटना हे त्याचेच उदाहरण आहे. त्यासाठी भूगोलशास्त्राचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना केली पाहिजे. या परिषदेत विचारविनिमय होऊन त्याचे निष्कर्ष मांडण्यात यावेत, असे त्यांनी सांगितले.
डॉ. पी. डब्ल्यु. देशमुख म्हणाले की, काही आपत्ती नैसर्गिक, तर काही मानवनिर्मित असतात. म्हणून नैसर्गिक आपत्तींचा नेहमी दूरगामी विचार करायला हवा. डॉ. नीलाद्री दास म्हणाले की, भूगोल ही मानवी उत्क्रांतीपासून चालत आलेली एक अभ्यास शाखा आहे. काही दशकांपूर्वी मानवाला कोणत्याही हताशपणे नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत होते. परंतु आजच्या काळात सर्व प्रकारच्या आपत्तींचा अभ्यास करून त्यावर उपाय योजले जात आहेत. म्हणून नैसर्गिक आपत्ती निवारण हा संशोधनाचा अत्यंत महत्त्वाचा व वेगळ्या स्वरूपाचा विषय आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात भारतातील नैसर्गिक आपत्ती व व्यवस्थापन या विषयावरील निवडक शोधनिबंधांच्या पुस्तकाचे प्रकाशन पतंगराव कदम यांच्याहस्ते झाले. यावेळी डॉ. के. आर. जाधव, डॉ. अर्जुन ननवरे, प्रा. नागराज पाटील यांना आदर्श भूगोल शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी डॉ. पी. जी. सप्तर्षी, डॉ. बी. एन. गोफने, डॉ. जे. सी. मोरे उपस्थित होते. स्वागत डॉ. सौ. एस. डी. कुलकर्णी यांनी केले. (वार्ताहर)