शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेतील दोन बालिकांची थॅलेसमियामुळे परवड

By admin | Updated: December 25, 2014 00:04 IST

जगण्यासाठी संघर्ष : रक्तपुरवठा करण्यास शहरातील रक्तपेढ्यांची टाळाटाळ; आई-वडिलांची धावाधाव --लोकमत विशेष

सदानंद औंधे - मिरज -थॅलेसमियाच्या रुग्णांना मोफत रक्त पुरवठा करण्याचे बंधन असतानाही रक्तपेढ्यांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याने मिरजेतील दोन बालिकांची परवड सुरू आहे. वैष्णवी (वय ३) व अनुष्का (वय १) या दोन गरीब कुटुंबातील बालिकांना नियमित उपचार मिळवून जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.थॅलेसमिया या जन्मजात विकाराने रुग्णांच्या रक्तातील पेशी, हिमोग्लोबीन कमी होत असल्याने अशा रुग्णांना ठराविक दिवसांनी रक्त द्यावे लागते. रक्त न दिल्यास थॅलेसमियाच्या रुग्णांचा जीव धोक्यात येतो. थॅलेसमियाच्या रुग्णांना नियमित रक्त मिळावे, यासाठी रक्तपेढ्यांना अशा रुग्णांना मोफत व तातडीने रक्त देण्याचे बंधन आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून रक्तपेढ्यांना परवाना देतानाच थॅलेसमियाच्या रुग्णांना रक्तपुरवठ्याची अट आहे. मात्र रक्तपेढीचालक थॅलेसमियाच्या रुग्णांना मोफत रक्तपुरवठ्यासाठी रक्तदाते आणण्याची अट घालत असल्याने गरीब रुग्णांची परवड होत आहे. मिरजेत हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या नरेश सचदेव या तिशीतील तरुणाच्या वैष्णवी व अनुष्का या दोन मुलींना थॅलेसमियाचा विकार आहे. तुटपुंजे उत्पन्न असलेल्या नरेशचा याही परिस्थितीत मुलींना जगविण्याचा निर्धार आहे. प्रत्येक मुलींना प्रत्येक तीन आठवड्यानंतर रक्त देण्यासाठी व औषधासाठी सुमारे दहा हजार रुपये खर्च आहे. सचदेव दाम्पत्य पोटाला चिमटा काढून मुलींसाठी वैद्यकीय खर्च करीत आहे. मात्र त्यांच्या धडपडीला रक्तपेढी चालकांकडून सहकार्य मिळत नसल्याने दुर्दैवी वैष्णवी व अनुष्का यांना वेळेवर उपचार मिळणे कठीण झाले आहे. ज्या रुग्णालयात उपचार करण्यात येतात, त्या रुग्णालयाच्या रक्तपेढीची रक्त पुरवठ्याची जबाबदारी असतानाही रक्तदाते आणण्याची किवा बाहेरून रक्त आणण्याची सक्ती करण्यात येते. अनेकवेळा रक्तदाते वेळेवर न मिळाल्याने वैष्णवी व अनुष्का या भगिनींना रक्तदात्यांच्या प्रतीक्षेत थांबावे लागते. काही रुग्णालयात ठराविक रक्तपेढ्यांतूनच रक्त आणण्याची मागणी होते. रक्त वेळेवर मिळाले नाही, तर वैष्णवी व अनुष्का यांना धाप लागणे, चक्कर येणे, थकवा येणे असा त्रास सुरू होतो. गोंडस व निरागस मुलींचे हाल बघवत नसल्याने त्यांच्या माता-पित्याची गेली तीन वर्षे धावपळ सुरू आहे. थॅलेसमियामुळे यापुढील आयुष्यातही खडतर परिस्थितीला तोंड द्यावे लागणार असल्याची सचदेव दाम्पत्याला जाणीव आहे. आर्थिक मदतीची गरजथॅलेसमिया या आजारासाठी बोन मॅरो ट्रान्स्प्लांट हा एकच उपचार आहे. मात्र त्यासाठी सुमारे ३० लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. दोन्ही मुलींसाठी ६० लाखांचा शस्त्रक्रियेचा पर्याय पेलविणारा नाही. मुलींना जगविण्यासाठी प्रत्येक २१ दिवसांनी रक्त देण्यासाठी सुरू असलेल्या धडपडीला नातेवाईकांची, समाजाची किंवा शासनाची मदत नसल्याने सचदेव दाम्पत्य हतबल आहे. समाजात मुलींची हेळसांड करण्याची प्रवृत्ती असताना सचदेव दाम्पत्याचा मुलींच्या दुर्धर आजाराविरुध्द लढा कौतुकास्पद आहे. तारुण्यात हौस, मौज करण्याऐवजी मुलींना जगविण्यासाठी सचदेव दाम्पत्याने सर्वस्व पणाला लावले आहे.