शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
लखनौच्या मैदानात पावसाचा खेळ अन् मिचेल मार्श नावाचं वादळ! सगळं संपल्यावर ठोकली विक्रमी सेंच्युरी
5
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
6
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
7
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
9
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
10
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
11
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
12
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
13
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
14
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
15
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
16
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
17
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
18
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
20
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे ज्वारी महागण्याची शक्यता

By admin | Updated: April 3, 2015 00:37 IST

जत तालुक्यातील चित्र : कडबा मोठ्याप्रमाणात काळा पडल्यामुळे वैरणीची टंचाई निर्माण होणार

गजानन पाटील - संख -जत तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे ज्वारी काळी पडली आहे. कडबा भिजल्यामुळे तोही काळा पडला आहे. तो जास्त दिवस टिकून राहणार नसल्याने कुजका वास येत असल्यामुळे वैरणीची टंचाई निर्माण होणार आहे. अवकाळी पावसामुळे ज्वारीच्या उत्पादनातही घट होणार आहे. उतारा कमी निघाल्यामुळे बाजारात ज्वारीच्या दरात वाढ होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कडबा कमी निघाल्यामुळे वैरणीची टंचाई निर्माण होणार असून दरात वाढ होणार आहे.
अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान यामुळे ज्वारी पिकावर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. थंडीचे प्रमाण कमी व ढगाळ हवामानामुळे गव्हाला लोंब्या कमी सुटल्या असून तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे ज्वारी व गव्हाच्या उत्पादनात घट होणार आहे.रब्बी हंगाम हा तालुक्यातील शेतीचा मुख्य हंगाम आहे. या हंगामात ९४ हजार २०० हेक्टर क्षेत्रात पिके घेतली जातात. त्यापैकी ७८ हजार ९०० हेक्टर क्षेत्रात ज्वारी पीक घेतले जाते. परतीच्या मान्सूनची दमदार हजेरी लाभल्यामुळे पेरणी वेळेवर झाली. अनुकूल हवामानामुळे रब्बीची पेरणी चांगली झाली. आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शिवारभर पिके बहरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. परंतु ऐन काढणीवेळी मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारीची कणसे काळी पडली आहेत. टपोरे दाणे काळे पडल्याने उत्पन्नावर परिणाम झाला आहे. वैरणही काळी पडली आहे. यावर्षी ५८ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे.बहुतेक ठिकाणी सध्या ज्वारी पिकाची काढणी, कणसे तोडणी-मळणी चालू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शेतातील खळ्यावर ज्वारीची कणसे बडवून मळणी करण्याचे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत. सध्या सर्वत्र शेतकरी वर्ग ज्वारीच्या कणसांची मळणी यंत्रावर करताना दिसत आहे. यंत्रावर मळणीचा दर पोत्याला १०० ते १२० रुपये असा आहे. काही ठिकाणी पोत्याला ४ ते ५ शेर ज्वारी घेतली जाते. यंत्रावर १० ते १२ पोती सहज निघतात, अशी माहिती मळणी यंत्र चालक बिराप्पा करपे यांनी दिली. मळणी यंत्रे बहुतेक रॉकेल किंवा डिझेलवर चालतात.
ज्वारीचा कडबा एकरी २००० ते २५०० पेंड्या निघत आहेत. शेतकरी आपल्या शेतातील कडबा न विकता जनावरांसाठी कडब्याच्या मोठ्या गंजी लावून ठेवत आहेत. पण झालेल्या अवकाळी पावसामुळे वैरण रानात भिजली आहे. शेतात असलेले ज्वारी पीकही भिजल्याने कडबा काळा पडला आहे. त्याचा कुजका कुबट वास येत आहे. त्यामुळे वैरणीची गंजी जास्त काळ टिकणार नाही. जनावरे थोड्या दिवसांनी ही वैरण खाणार नाहीत. वैरणीच्या दरात वाढ होणार आहे. सध्या ६ रुपये २५ पैसे पेंडीस, इतका दर आहे. तालुक्यामध्ये २ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर गहू पिके घेतले जाते. यावर्षी परतीच्या समाधानकारक पावसामुळे गहू क्षेत्रात वाढ झाली आहे. कमी थंडी सुटल्यामुळे गव्हाला लोंब्या कमी उरलेल्या असून टपोरे दाणे भरलेले नाहीत. ढगाळ हवामानामुळे तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. अवकाळी पावसाने गहूही भिजला आहे. लोंब्या गळून पडल्या आहेत. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे.
मजुराची टंचाई जाणवत आहे. मजुरीच्या दरात वाढ झाली आहे. ९ ते २ वाजेपर्यंत पुरूषाला २०० रुपये, तर महिलेस १५० रुपये, मजुरी द्यावी लागत आहे. गावात दुपारच्यावेळी माणसांची वर्दळ कमी झाली आहे.