शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

चारुता सागर यांचे साहित्यात वेगळे स्थान

By admin | Updated: November 24, 2014 23:04 IST

विश्वासराव मोरे : मळणगावमध्ये एकदिवसीय साहित्य संमेलन

शिरढोण : ‘नागीण’ कथासंग्रहातील नागीण, अंघोळ या मराठी साहित्यामधील अस्सल वाण कथा वाचत असताना, आजूबाजूला हुबेहूब घडत असल्याचा भास या कथांमध्ये दिसून येतो. उपेक्षितांचे जीवन उलगडून दाखविण्यात चारुता सागर यांचा हातखंडा असायचा. त्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांच्या कथांनी मराठी सारस्वतात स्वत:चं वेगळं स्थान पटकावलं आहे, असे मत जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वासराव मोरे यांनी व्यक्त केले.
मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील ज्येष्ठ कथाकार व लेखक चारुता सागर यांच्या ८५ व्या जयंतीनिमित्त एकदिवसीय साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक, चक्रव्यूह आकृती कादंबरीकार आप्पासाहेब पाटील होते. दत्ताजीराव शिंदे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.
यावेळी प्राध्यापक अनिल पाटील यांनी ‘हराळी’ ही गवतावर आधारित कविता सादर केली, तर प्रा. विजय जाधव यांनी कथा सादर केली. चारुता सागर यांच्या कथेचे अभिवाचन दत्तात्रय क्षीरसागर यांनी केले, तर संयोजन राजेंद्र भोसले, अनिल कुंभार, राजेंद्र साळुंखे यांनी केले.
या साहित्य संमेलनामध्ये ‘नागीण, मामाचा वाडा, नदीपार’ आदी कथासंग्रहांचे वाचन करण्यात आले. साहित्यरसिकांच्या मनात राज्य करणारे ज्येष्ठ कथाकार व कसदार लेखन करणारे चारुता सागर यांच्या कथा ऐकून उपस्थित भारावून गेले होते.
यावेळी सरपंच रमेश भोसले, अविराजे शिंदे, धनाजी पाटील, दिग्विजय शिंदे, भालचंद्र क्षीरसागर, माजी सरपंच जगन्नाथ चव्हाण, उध्दव पाटील, राजाराम पाटील, राजेंद्र भोसले, दत्ताजीराव शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन चारुता सागर साहित्य व सांस्कृतिक मंडळ, मळणगाव यांनी केले. (वार्ताहर)