शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

धोबी समाजाच्या आरक्षणप्रश्नी विशेष अधिवेशन बोलवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:25 IST

सांगली : गेल्या साठ वर्षांपासून धोबी समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यात यावे, या मागणीकरिता मोर्चे, धरणे, ...

सांगली : गेल्या साठ वर्षांपासून धोबी समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यात यावे, या मागणीकरिता मोर्चे, धरणे, विविध आंदोलने करूनही शासनाने त्याची दखल घेतली नाही. याप्रश्नी लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलवावे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करू, असा इशारा धोबी समाजाचे नेते व महाराष्ट्र राज्य परीट-धोबी सेवा मंडळाचे सांगली जिल्हाध्यक्ष संताजी शिंदे यांनी दिला.

पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सरकारला धोबी समाज नव्याने आरक्षण मागत नसून १ मे १९६० पूर्वी हा समाज अनुसूचित जातीमध्ये गणला जात होता; परंतु महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर तत्कालीन सरकारने धोबी समाजाला अनुसूचित जातीतून काढून ओबीसीमध्ये समाविष्ट केले. धोबी समाजावर अन्याय केला.

महाराष्ट्र सरकारने धोबी समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीचे आरक्षण द्यायचे की नाही, याकरिता ५ सप्टेंबर २००१ ला तत्कालीन आमदार डाॅ. दशरथ भांडे याच्या अध्यक्षतेखाली धोबी समाज पुनर्विलोकन समितीची स्थापना केली होती. या समितीने ५ मार्च २००२ ला डाॅ. भांडे समितीचा अहवाल तत्कालीन समाजकल्याण मंत्र्यांना सोपविला. धोबी समाज अनुसूचित जातीचे निकष पूर्ण करतो, त्यांना अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास काही हरकत नाही, अशा आशयाचा अहवाल सरकारला दिला असून, हा अहवाल महाराष्ट्र सरकारने अद्याप शिफारशींसह केंद्र सरकारला पाठविला नाही.

मराठा आरक्षणाकरिता विशेष अधिवेशन बोलाविण्यात आल्यास याच अधिवेशनात धोबी समाजाच्या आरक्षणाकरिता डाॅ. भांडे समितीचा अहवाल राज्य शासनाच्या शिफारशीसह केंद्र सरकारला पाठवावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे शिंदे यांनी म्हटले आहे. पत्रकावर अखिल भारतीय धोबी महासमाज सदस्य दत्तात्रय बन्ने, सांगली जिल्हा लाँड्री असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल पवार, सागर देवरुखकर, लता साळुंखे, शंकर राक्षे, विलास गायकवाड, बन्सीलाल कदम, स्मिता पवार, सुनील शिंदे, चंदू पवार, मेजर साळुंखे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.