शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
'ऑपरेशन सिंदूर'च्या टीमसाठी ममता बॅनर्जीची सहमती, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी परदेश दौऱ्यावर जाणार
3
ज्योती मल्होत्रा ​​बिहारच्या या हॉटेलमध्ये २ दिवस राहिली; पुढे कुठे गेली? आणखी धक्कादायक माहिती समोर आली
4
IPL 2025: Mumbai Indians ने 'करो वा मरो' सामन्याआधी ३ नव्या स्टार खेळाडूंना घेतलं संघात, पाहा कोण?
5
Jyoti Malhotra : आधी घेतली मुलीची बाजू, आता मात्र युटर्न! ज्योती मल्होत्राचे वडील म्हणतात, "मला माहीत नाही..." 
6
Navi Mumbai Murder: नवी मुंबईत महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ
7
आता फ्रॉडचं नो टेन्शन! पेमेंट करण्यापूर्वी फॉलो करा 'ही' सरकारी ट्रिक; कोणीही घालणार नाही गंडा
8
एमबीए असल्याचं सांगून लावलं लग्न, पती निघाला आठवी पास, काँग्रेस नेत्याच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप  
9
शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज द्या, मुख्यमंत्री फडणवीस यांचा बँकांना सज्जड दम
10
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
11
“उन्होंने गोली चलाई, पर धमाका हमने किया”; ‘ऑपरेशन सिंदूर’मधील मेजरने सांगितली Inside Story
12
पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार...
13
बापरे! अवघ्या ७ महिन्यात २३ वर्षीय युवतीनं २५ युवकांचं आयुष्य केले बर्बाद, काय आहे प्रकार?
14
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
15
कोविडचे रुग्ण वाढताहेत, भारताला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका? ICMR च्या माजी तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 
16
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
17
सासू असावी तर अशी! लग्नानंतर सुनेने शिकण्याची इच्छा व्यक्त करताच हात धरून नेलं शाळेत
18
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
19
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
20
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती

धोबी समाजाच्या आरक्षणप्रश्नी विशेष अधिवेशन बोलवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:25 IST

सांगली : गेल्या साठ वर्षांपासून धोबी समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यात यावे, या मागणीकरिता मोर्चे, धरणे, ...

सांगली : गेल्या साठ वर्षांपासून धोबी समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यात यावे, या मागणीकरिता मोर्चे, धरणे, विविध आंदोलने करूनही शासनाने त्याची दखल घेतली नाही. याप्रश्नी लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलवावे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करू, असा इशारा धोबी समाजाचे नेते व महाराष्ट्र राज्य परीट-धोबी सेवा मंडळाचे सांगली जिल्हाध्यक्ष संताजी शिंदे यांनी दिला.

पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सरकारला धोबी समाज नव्याने आरक्षण मागत नसून १ मे १९६० पूर्वी हा समाज अनुसूचित जातीमध्ये गणला जात होता; परंतु महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर तत्कालीन सरकारने धोबी समाजाला अनुसूचित जातीतून काढून ओबीसीमध्ये समाविष्ट केले. धोबी समाजावर अन्याय केला.

महाराष्ट्र सरकारने धोबी समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीचे आरक्षण द्यायचे की नाही, याकरिता ५ सप्टेंबर २००१ ला तत्कालीन आमदार डाॅ. दशरथ भांडे याच्या अध्यक्षतेखाली धोबी समाज पुनर्विलोकन समितीची स्थापना केली होती. या समितीने ५ मार्च २००२ ला डाॅ. भांडे समितीचा अहवाल तत्कालीन समाजकल्याण मंत्र्यांना सोपविला. धोबी समाज अनुसूचित जातीचे निकष पूर्ण करतो, त्यांना अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यास काही हरकत नाही, अशा आशयाचा अहवाल सरकारला दिला असून, हा अहवाल महाराष्ट्र सरकारने अद्याप शिफारशींसह केंद्र सरकारला पाठविला नाही.

मराठा आरक्षणाकरिता विशेष अधिवेशन बोलाविण्यात आल्यास याच अधिवेशनात धोबी समाजाच्या आरक्षणाकरिता डाॅ. भांडे समितीचा अहवाल राज्य शासनाच्या शिफारशीसह केंद्र सरकारला पाठवावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे शिंदे यांनी म्हटले आहे. पत्रकावर अखिल भारतीय धोबी महासमाज सदस्य दत्तात्रय बन्ने, सांगली जिल्हा लाँड्री असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल पवार, सागर देवरुखकर, लता साळुंखे, शंकर राक्षे, विलास गायकवाड, बन्सीलाल कदम, स्मिता पवार, सुनील शिंदे, चंदू पवार, मेजर साळुंखे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.