शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीणचा टक्का वाढल्याने चिंता विधानसभा निवडणूक :

By admin | Updated: October 16, 2014 22:51 IST

सांगली मिरज क्षेत्रातील टक्का झाला कमी, आकड्यांवर व्यक्त केले जाताहेत अंदाज

सांगली : महापालिका क्षेत्रातील मतांचा टक्का घटला असतानाच ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी मतांचा टक्का वाढल्याने अनेकांना चिंता लागली आहे. मतांचा वाढलेला टक्का कोणाच्या फायद्याचा आणि तोट्याचा यावरून तर्कवितर्क सुरू झाले आहेत. मतांचा टक्का वाढावा म्हणून प्रशासकीय स्तरावर प्रयत्न झाले होते. ग्रामीण भागातून त्याप्रमाणे टक्का वाढला असला तरी, या वाढलेल्या व कमी झालेल्या टक्केवारीवर निकालाचे गणित मांडले जात आहे. मतदानाची प्रक्रिया बुधवारी पार पडल्यानंतर मतांच्या अंतिम आकड्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गुरुवारी प्रशासनाने याबाबतची अधिकृत माहिती जाहीर केली. जिल्ह्यातील आठपैकी सांगली व मिरज या दोनच मतदारसंघात साठ टक्क्यांच्या घरात मतदान झाले आहे. उर्वरित सर्वच मतदारसंघात ६५ टक्क्यांवर मतदान झाले आहे. यातही ग्रामीण भागातील मतांचे आकडे मोठे आहेत. मतदानाच्या आकडेवारीची तुलना गत निवडणुकीतील आकड्यांशी केली जात आहे. बहुतांश मतदारसंघातील मतदानाचे आकडे यंदा वाढले आहेत. त्यामुळे वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार आणि कोणाला त्याचा फटका बसणार, याची चर्चा आता रंगलेली आहे. अशा गणिताला कोणताही शास्त्रीय आधार नसला तरी, त्याची चर्चा प्रत्येक निवडणुकीत होत असते. यंदाही त्यापद्धतीने सुरू आहे. पारंपरिक अंदाज व्यक्त करण्याच्या गावोगावी आणि गल्लोगल्ली अशाचप्रकारच्या चर्चांना आता ऊत आला आहे. आकडेवारीवरून आता पैजाही लावल्या जात आहेत. गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा जिल्ह्याच्या मतदानाच्या आकडेवारीत २.५५ टक्के इतकी वाढ झाली आहे. तुलनेने गतवेळेपेक्षा मतदानाचा टक्का घटलेल्या मतदारसंघात मिरज आणि इस्लामपूर या दोन मतदारसंघाचा समावेश आहे. निवडणुकीत मताचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाने मतदार जागृती मोहीम राबविली होती. त्याचा परिणामही ग्रामीण भागात जाणवला. (प्रतिनिधी) विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान टक्केवारी मतदारसंघ२००९ मध्ये २०१४ मध्ये सांगली५८.७६५९.११ शिराळा७७.४७७८.८७ तासगाव-क. म.६३.४४७६.६१ पलूस-कडेगाव७८.००८१.६४ मिरज६२.७३६१.३० खानापूर६७.५१७३.१४ इस्लामपूर७५.५९७२.०३ जत६६.००६८.0८ एकूण६८.६८७०.८४ सर्वाधिक मतदान पलूस-कडेगावमध्ये मतदानाच्या अधिकृत आकडेवारीनुसार पलूस-कडेगावने मतदानात अव्वल क्रमांक पटकाविला आहे. याठिकाणी ८१.६४ टक्के मतदान झाले आहे. यात १ लाख ७ हजार २0५ पुरुषांनी तर ९९ हजार ८५८ महिलांनी मतदान केले आहे. जिल्ह्यात सर्वात कमी मतदान सांगली विधानसभा मतदारसंघात नोंदले गेले आहे. सांगली विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या ही उर्वरित सात मतदारसंघापेक्षा अधिक आहे. याठिकाणची एकूण मतदारसंख्या ३ लाख २८ हजार ३७0 इतकी आहे. तरीही सांगलीत केवळ ५९ टक्के मतदान झाले. मिरजेतही कमी मतदानाची नोंद झाली. मिरजेची एकूण मतदारसंख्या ३ लाख १ हजार ४३७ इतकी आहे. सांगलीनंतर सर्वाधिक मतदारसंख्या मिरजेत आहे. तरीही मिरजेत ६१.३0 टक्के मतदान झाले. महापालिका क्षेत्रातील मोठा भाग या दोन्ही मतदारसंघात येतो. शहरी चेहरा असलेल्या या मतदारसंघात मतदानाबाबतची उदासीनता स्पष्टपणे दिसून आली. मिरजेत ग्रामीणमध्ये सर्वाधिक मतदान मिरज : मिरज विधानसभेसाठी ग्रामीण भागात सर्वाधिक ७० ते ७५ टक्के व मिरज शहरात केवळ ५५ टक्के मतदान झाले. शहरात मतदान कमी झाल्याने त्याचा कोणाला फटका बसणार, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. विधानसभेसाठी पंचरंगी लढत असतानाही शहरात मतदान कमी झाले. मिरज पूर्व भागातील मालगाव, आरग, बेडग यासह अन्य गावांत चुरशीने ७० ते ७५ टक्के मतदान झाले. मतदानाची टक्केवारीही कमी झाल्याने त्याचा कोणाला फायदा व कोणाला तोटा होणार, याचे आडाखे बांधण्यात येत आहेत. शहरात सुमारे सव्वालाख मतदार आहेत. ग्रामीण व शहरातील मतदानाच्या आकडेवारीमुळे कौल कुणाला मिळणार, याची उत्सुकता आहे. (वार्ताहर)