शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पाईपलाईन लिकेजवर वर्षाला ५० लाखांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:22 IST

सांगली : महापालिका क्षेत्रात मुबलक व शुद्ध पाणीपुरवठ्यावरून नेहमीच ओरड सुरू असते. त्यात पाईपलाईनची गळती व विविध कारणांमुळे जवळपास ...

सांगली : महापालिका क्षेत्रात मुबलक व शुद्ध पाणीपुरवठ्यावरून नेहमीच ओरड सुरू असते. त्यात पाईपलाईनची गळती व विविध कारणांमुळे जवळपास २५ टक्के पाणी वाया जाते. गळती व इतर दुरूस्तीसाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. गेल्या काही वर्षांत शहराचा विस्तार वाढला. नव्याने पाईपलाईन टाकल्या गेल्या. पाण्याच्या टाक्या उभारल्या, पण या साऱ्याची देखभाल दुरुस्ती करणारी यंत्रणा मात्र उभी करण्यात महापालिका अपयशी ठरली आहे.

महापालिका क्षेत्रात अमृत पाणी योजनेसह विविध प्रकल्प सुरू आहेत. नव्याने १४ ते १५ पाण्याच्या टाक्या उभारल्या गेल्या. कुपवाडसाठी नवीन पाणी योजनाही अस्तित्वात आली. शहरातील जलवाहिन्याही बदलण्यात आल्या. तरीही अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यात पाण्याच्या गळतीचे प्रमाणही अधिक आहे. गळती काढण्याचे काम करण्यासाठीही अपुरी यंत्रणा आहे.

चौकट

लिकेजमुळे २५ टक्के पाणी वाया

महापालिकेकडून सांगली व मिरज या दोन शहरासाठी दररोज ११५ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा केला जातो. या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी सांगलीत दोन, तर मिरजेत एक जलशुद्धीकरण केंद्रे आहेत. पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यासह शहरातील ठिकठिकाणच्या गळतीद्वारे जवळपास २५ टक्के पाणी वाया जाते. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही.

चौकट

कोट

महापालिका क्षेत्राचा विस्तार मोठा आहे. त्यामुळे सध्याच्या यंत्रणेवर ताण पडतो. उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारावर लवकरात लवकर लिकेज काढण्याचे काम केले जाते. सध्या मानधनावरील कर्मचाऱ्याकडून कामे करून घेतली जात आहेत. तर मोठ्या पाईलपाईनचे लिकेज काढण्याचे काम खासगी एजन्सीकडे आहे. - आर. जी. रजपूत, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग.

चौकट

शहरातील पाणीपुरवठ्याचे वर्षाचे बजेट : ३६ कोटी ६५ लाख

पाणीपुरवठ्याचे वर्षाचे वीजबिल : १२ कोटी

पाणीपुरवठ्यासंदर्भातील एकूण कर्मचारी : २७५

फोटो ओळी :- २५ शीतल ०१ - शहरातील शंभरफुटी रस्त्यावरील दांडेकर मार्गावर गेल्या कित्येक महिन्यापासून जलवाहिनीला गळती लागली होती. व्हाॅल्व्हमधूनच पाणी रस्त्यावर येत होते. आता महापालिकेने खड्डा खोदून दुरुस्ती हाती घेतली आहे.

२५ शीतल ०२- मिरजेतील शास्त्री चौक परिसरात महिन्याभरापासून जलवाहिनीला गळती होती. नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर आता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनी दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे.

२५शीतल ०३ - काळी खणजवळील महिन्याभरापासून मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे. महापालिकेने जलवाहिनी दुरूस्तीसाठी खड्डा खणला आहे. पण अजून त्याची दुरूस्ती केलेली नाही. त्यामुळे पाणी वाया जात आहे.